साकोरा- नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरातील शेत शिवारात गेल्या काही दिवसांपासून वन्यप्राण्यांचा संचार सुरू झाल्याने शेतमालाचे नुकसान झाले आहे. त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे..मुळडोंगरी, पांझण, नवादे, खैरमाळ, नवे पांझण, गव्हाळी, वाघदड, सारतळे आदी शेतशिवारात यावर्षी विहीरींना पाणी चांगले असल्याने मका , कांदे, बाजरी, भुईमूग जोमात आहे. परिसरात रानडुक्कर व हरणांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. .त्यांना जंगलात पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही तसेच खाण्यासाठी हिरवे काही नाही म्हणून त्यांनी रब्बी पिकान कडे आपला मोर्चा वळवून पिकांचे नुकसान करीत आहेत. याबाबत वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची अनेकवेळा तोंडी मागणी केली होती. मात्र संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने आज उभ्या पिकांची या वन्यप्राण्यांनी शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे..वनविभागाला संगीता भगवान बोरसे यांचा गट नंबर ५३० या महिला शेतकऱ्याने वनविभागाला निवेदन दिले. त्यांचे मका,कांदे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, संबंधित विभागाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी संदीप बोरसे, अशोक बच्छाव, प्रीतम बोरसे,अनिल बोरसे, अमित बोरसे, रामदास बोरसे, भारत बोरसे , भारत जाधव , ज्ञानेश्वर सुरसे ग्यानदेव सुरसे आदी शेतकऱ्यांनी केली आहे..मी एक एकर भुईमुगाचे पीक मोठ्या कसरतीने उभे केले होते रात्र पहाट करून पाणी भरले होते परंतु तीनशे ते चारशे हरणांचा कळप परिसरात असल्याने रात्री त्यांनी पूर्ण भुईमुगाचे पीक उध्वस्त केलं सकाळी पाहतो तर शेतात काहीच नव्हते शेवटी भुईमुगाचे पीक सोडून द्यावे लागले. "-ज्ञानदेव सुरसे, सरताळे.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
साकोरा- नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरातील शेत शिवारात गेल्या काही दिवसांपासून वन्यप्राण्यांचा संचार सुरू झाल्याने शेतमालाचे नुकसान झाले आहे. त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे..मुळडोंगरी, पांझण, नवादे, खैरमाळ, नवे पांझण, गव्हाळी, वाघदड, सारतळे आदी शेतशिवारात यावर्षी विहीरींना पाणी चांगले असल्याने मका , कांदे, बाजरी, भुईमूग जोमात आहे. परिसरात रानडुक्कर व हरणांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. .त्यांना जंगलात पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही तसेच खाण्यासाठी हिरवे काही नाही म्हणून त्यांनी रब्बी पिकान कडे आपला मोर्चा वळवून पिकांचे नुकसान करीत आहेत. याबाबत वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची अनेकवेळा तोंडी मागणी केली होती. मात्र संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने आज उभ्या पिकांची या वन्यप्राण्यांनी शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे..वनविभागाला संगीता भगवान बोरसे यांचा गट नंबर ५३० या महिला शेतकऱ्याने वनविभागाला निवेदन दिले. त्यांचे मका,कांदे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, संबंधित विभागाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी संदीप बोरसे, अशोक बच्छाव, प्रीतम बोरसे,अनिल बोरसे, अमित बोरसे, रामदास बोरसे, भारत बोरसे , भारत जाधव , ज्ञानेश्वर सुरसे ग्यानदेव सुरसे आदी शेतकऱ्यांनी केली आहे..मी एक एकर भुईमुगाचे पीक मोठ्या कसरतीने उभे केले होते रात्र पहाट करून पाणी भरले होते परंतु तीनशे ते चारशे हरणांचा कळप परिसरात असल्याने रात्री त्यांनी पूर्ण भुईमुगाचे पीक उध्वस्त केलं सकाळी पाहतो तर शेतात काहीच नव्हते शेवटी भुईमुगाचे पीक सोडून द्यावे लागले. "-ज्ञानदेव सुरसे, सरताळे.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.