digital 7 12 portal
sakal
सटाणा - बागलाण तालुक्यावर अवकाळी पाऊस व गारपिटीने कहर केला असताना, आता तांत्रिक अडचणींचा नवा फेरा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. मार्चअखेर आणि एप्रिलच्या सुरुवातीला झालेल्या नैसर्गिक आपत्तीत शेतीक्षेत्र उद्ध्वस्त झाल्याने बळीराजाचे कंबरडे मोडले असून, शासनाकडून पंचनामे सुरू झाले आहेत.