student safety issue
sakal
सटाणा: ईव्हीएम मशिन्स सुरक्षित; पण विद्यार्थी असुरक्षित असा विरोधाभासी संदेश शहरातील नगर परिषद निवडणूक व्यवस्थेतून दिला जात असल्याचे चित्र आहे. निवडणूक आयोग व प्रशासनाने ईव्हीएम मशिन्सच्या सुरक्षिततेसाठी हजारो विद्यार्थ्यांचे शाळेचे पूर्वेकडील प्रवेशद्वार बंद केल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांना रोज जीव धोक्यात घालून अरुंद व वर्दळीच्या दोधेश्वर नाका व नामपूर रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे.