Narhari Zirwal
sakal
नाशिक: आगामी सिंहस्थ- कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पायाभूत सोयीसुविधा उभारण्यात येणार असून, या कामांसाठी आवश्यक तेवढ्याच जमिनीचे संपादन केले जाईल आणि बाधित शेतकऱ्यांना योग्य व न्याय्य मोबदला दिला जाईल, अशी ठाम ग्वाही अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली. जिल्ह्याच्या विकासासाठी शेतकऱ्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.