Nashik News: पिंपळगाव बसवंत तालुक्याचा मार्ग सुकर; तालुका विभाजनासाठी राज्य शासनाने घेतला सुधारित निर्णय

maharashtra shasan
maharashtra shasanesakal

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : शासनाकडून तालुका विभाजनासाठी सुधारित निकष निश्‍चितीसाठी तालुका पुनर्रचना समिती स्थापन केली असून तंत्रज्ञानामध्ये झालेली सुधारणा तसेच कपूर समितीच्या सूत्रानुसार राज्यातील तालुक्यांबाबतीत निकष निश्‍चीत करण्यासाठी ही समिती गठित करण्यात आली आहे.

शासनाने तसा निर्णय घोषित केल्याने पिंपळगाव तालुक्याचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे निफाड तालुक्यातून नव्या पिंपळगाव बसवंत तालुका निर्मितीची २५ वर्षांपासूनची प्रतिक्षा संपून तालुका दर्जा मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

पिंपळगावला प्रस्तावीत तालुक्याचा दर्जा मिळाल्यास उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत तालुका अशी ओळख मिळेल. (state government taken revised decision for Pimpalgaon Baswant taluka division Nashik News)

राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील काही तालुक्यांच्या लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने अशा तालुक्याचे विभाजन करण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे सातत्याने प्राप्त होत होते. २५ वर्षापूर्वीच पिंपळगाव हे तालुक्याच्या निकषात बसत असल्याने तसा पाठपुरावा सुरू होता.

पण राज्यात दोनदा सत्तांतर होऊन ही प्रश्‍न जैसे थे राहिला. तालुका विभाजनाच्या मानसिकतेत शासन आले आहे. त्यामुळे पिंपळगाव शहराच्या भाळी तालुक्याच्या दर्जाचा कुमकुम तिलक लागू शकतो.

तालुका विभाजन करताना काळानुरूप माहिती व तंत्रज्ञानात झालेल्या सुधारणा व महसुली सेवांचे झालेले संगणकीकरण या सर्व बाबीचा विचार होऊन त्यानुसार तालुका विभाजनाचे निकष सुधारित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

महाराष्ट्र शासनाने तालुका विभाजनासाठी निर्धारीत केलेले सुधारित निकष हे पिंपळगाव बसवंत तालुका होण्यासाठी तंतोतंत जुळत आहे.तालुक्याचा दर्जा मिळण्यासाठी पुरेशी गावे व लोकसंख्या आहे.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

maharashtra shasan
Bhongrya Bazar : बोरदला आज भोंगऱ्या बाजार; होळीच्या पूर्वसंध्येला आदिवासी बांधवांचे विविध उपक्रम

दिडोरी तालुक्यातील मोहाडी व चांदवडतालुक्यात वडनेर भैरव जिल्हापरिषद गट पिंपळगाव जोडण्याचा प्रस्ताव यापूर्वीच शासनाकडे सादर करण्यात आला आहे. पिंपळगावचे रूपांतर तालुक्यात करावे म्हणून परिसरातील गावांची मागणी आहे.कारण शासकीय कामांसाठी निफाड हे अनेक गावांना गैरसोयीचे ठरत आहे.

पुरेशा लोकसंख्ये बरोबरच महामार्ग, ग्रामीण रूग्णालय, पोलिस ठाणे, राष्ट्रीयकृत बँका, बाजार समिती, उपनिबंधक कार्यालय, न्यायालय, शाळा, महाविद्यालय अशी विविध शासकीय व निमशासकीय कार्यालय यापूर्वीच कार्यरत आहे.

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वाधिक मोठी बाजारपेठ असल्याने हजारो नागरिकांचा पिंपळगांवशी दररोजचा संपर्क असतो. पिंपळगाव वकील संघामार्फत अनेकदा शासनाकडे पाठपुरावा झाला पण पिंपळगांवकरांच्या नशिबी उपेक्षाच मिळाली.

पिंपळगावमध्ये सर्व सुविधा संगणकीकृत झालेल्या आहेत. माहिती तंत्रज्ञानामुळे झालेला बदलाचा लाभ नागरिकांना येथून मिळत आहे. शासन निश्‍चीत या बाबींचा विचार करून पिंपळगाव बसवंत तालुका निर्मितीसाठी सकारात्मक पाऊल उचलेले अशी पिंपळगाव व परिसरातील नागरिकांना अपेक्षा आहे.

maharashtra shasan
RTE Admission : येवल्यात 246 विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत मिळणार प्रवेश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com