नाशिक : वाहतुकीचा ठेका निश्चित करण्यात आल्यानंतर पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मागील आठ दिवसांपासून १७५ दिवसांचा कोरडा शिधा देण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. यापुर्वी राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वर्षभर शालेय पोषण आहार ठेका निश्चिती अभावी तांदुळ मिळाला नव्हता.
शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा टक्का वाढावा या हेतूने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये मध्यान्ह भोजन दिले जाते. वर्षभर अन्न पुरवठा करण्यासाठी ठेकेदारांची निश्चिती होते. वर्षभर पुरवठ्याचे काम चालते. चालु शैक्षणिक वर्षात जुलैमध्ये ठेका संपला होता. एकीकडे ठेक्याची मुदत संपुष्टात येत असताना नवीन ठेकेदार निश्चित करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवावी लागते किंवा ठेकेदार निश्चित करावा लागतो. परंतू, वाहतुकदार निश्चित न झाल्याने ऑगस्ट ते मार्च अखेरपर्यंत विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळाला नाही. एप्रिलसाठी आठ दिवसांपुर्वी वाहतुकदार निश्चित झाला असून, त्यानुसार तातडीने पोषण आहार पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला. पोषण आहारात कोरडा शिधा देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामुळे ऑगस्ट ते मार्च अखेरपर्यंत १७४ दिवसांच्या पोषण आहाराचा कोरडा शिधा विद्यार्थ्यांना शाळांमध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आला.
शाळांमध्ये आहार
एप्रिलपासून कोरडा शिधा व वाहतुकदार निश्चित झाल्याने या महिन्यातील २३ दिवस विद्यार्थ्यांना शाळेमध्येच पोषण आहार शिजवून दिला जाणार आहे. अशी माहिती प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी दिली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.