Sugar Production : उतारा कमी असल्याने यंदा राज्यात साखर उत्पादनात घट!

Sugar production
Sugar productionesakal

मालेगाव (जि. नाशिक) : राज्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. मार्चअखेर २१० पैकी १६६ कारखान्यांचा हंगाम बंद झाला. अजून ४४ कारखाने सुरू आहेत.

गेल्या वर्षाच्या तुलनेत उसाचे व गळीत हंगाम सुरू करणाऱ्या कारखान्यांची संख्या वाढूनही यंदा साखर उताऱ्यामुळे उत्पन्नात घट होणार आहे. (sugar production in state decreased due to less harvest nashik news)

गेल्या वर्षी राज्याचा सरासरी साखर उतारा १०.४० होता. या वर्षी तो आतापर्यंत ९.९६ एवढाच आहे. यंदा अतिवृष्टीने उसाचे नुकसान झाले. मोठ्या प्रमाणावर रसवंतीगृह सुरू आहेत. गुळाचे कारखाने, तसेच कच्चा ऊस चारा म्हणून खरेदी केला जात असल्याने शिल्लक उसाचा प्रश्‍न भेडसावण्याची शक्यता धूसर आहे.

दरम्यान, नाशिक जिल्हा ऊस व साखर उत्पादनात दिवसेंदिवस पिछाडीवर पडत आहे. राज्यातील आठ विभागांतील १०६ सहकारी व १०४ खासगी, असे एकूण २१० साखर कारखाने यंदा सुरू झाले.

मार्चअखेर एक हजार ४५ लाख टन उसाचे गाळप होऊन एक हजार ४१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेण्यात आले. गेल्या वर्षी १९८ साखर कारखाने सुरू होते. गळीत हंगाम सुरू करणाऱ्या साखर कारखान्यांची संख्या या वर्षी १२ ने वाढली.

राज्यात कोल्हापूर विभागाचा सर्वांत जास्त ११.४३, तर त्या खालोखाल पुणे १०.१० व नांदेड १०.०२ साखर उतारा आहे. सर्वांत कमी नागपूर ७.२०, सोलापूर ८.९४, छत्रपती संभाजीनगर ९.२६, अमरावती ९.५४, नगर ९.६५ एवढा साखर उतारा राहिला.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

Sugar production
NDA Exam : 'एनडीए' परीक्षा केंद्रासाठी नाशिकला हुलकावणी; विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी गाठावे लागतंय अन्‍य शहर

कच्चा ऊस गाळल्यामुळे साखर उताऱ्यात घट झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यंदा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच राज्यात सर्वत्र रसवंतीगृहे सुरू झाली. रसवंतीगृहांत पाच ते सहा हजार रुपये टन भाव मिळत असून, रोख पैसे मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल रसवंतीगृहांना ऊस विक्रीकडे राहिला.

काही शेतकऱ्यांनी कच्चा ऊस चारा म्हणून बाजारात विक्रीस प्राधान्य दिले. पावसाळा सुरू होण्यास दोन महिन्यांचा अवधी आहे. त्यामुळे गेल्या वर्षासारखा शिल्लक उसाचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता दिसत नाही.

"नाशिक जिल्ह्यातील कारखान्यांची गाळप क्षमता पाहता ऊस उत्पादकांना उचित न्याय मिळत नाही. जिल्ह्यात नऊपैकी केवळ दोनच कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. जिल्ह्यात किमान ४० लाख टन ऊस उत्पादित होऊ शकतो. परंतु कारखान्यांची परिस्थिती चांगली नसल्याने शेतकरी उसाचे उत्पादन घेण्यासाठी पुढे येत नाहीत. राज्यात साखर उद्योगात आगामी वर्षात उत्पादनाची हीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे."

-कुबेर जाधव, समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Sugar production
Police Constable Recruitment : लेखी परीक्षेला पाचशेवर उमेदवार; नमुना उत्तरपत्रिका प्रसिद्ध

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com