स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्षांनीच द्राक्षबागेवर चालवली कुऱ्हाड

The farmer destroyed the grape yard due to losses
The farmer destroyed the grape yard due to lossesesakal


चिंचखेड (जि. नाशिक) : सततच्या अस्मानी, सुलतानी संकटामुळे द्राक्षबागांचे नुकसान आणि दरवर्षीची आर्थिक जुळजुळवा करताना होणाऱ्या कसरतीला वैतागून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. संदीप जगताप यांनी आपल्या २० गुंठे द्राक्षबागेवर बुधवारी (ता. ३) कुऱ्हाड चालविली. पोटच्या मुलाप्रमाणे जपलेली बाग तोडताना मात्र असंख्य वेदना झाल्याचे सांगत ‘द्राक्षबागेला द्राक्ष येत नाही, तर टेन्शन येते’ अशी व्यथित करणारी प्रतिक्रीया त्यांनी दैनिक ‘सकाळ’ला दिली.

वेदनेलाही पाझर फुटावा...

‘मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चळवळीत आलो कधी अन्‌ विरघळलो कधी, कळलेच नाही. शेतकरी संपानंतर राजू शेट्टी यांचे बोट धरले अन्‌ साहेबांनी माझ्यासारख्या फाटक्या माणसाला खूप कमी दिवसात राज्याचे अध्यक्ष केले. अर्थात, आज हे का आठवतंय, तर मी आता माझी द्राक्षाची बाग तोडतोय...! चळवळीत आल्याची फळं भोगतोय... सत्तरीच्या आसपास पोहचलेले वडील बाजूला बसलेत... आजारी आई घरात आहे अन्‌ दिवाळीचा दिवस असून, सुद्धा बायको काही न बोलता माझ्यासोबत वावरात उन्हा-तान्हात हुंदका दाबून साथ देतेय.’ वेदनेलाही पाझर फुटावा, अशी भावूक प्रतिक्रिया देताना प्रा. जगताप यांनी अस्मानी, सुलतानी संकटाचा किती सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय, याचे वास्तव मांडले.

The farmer destroyed the grape yard due to losses
सावधान! दिवाळीत परगावी जाताना घ्या खबरदारी

प्रा. जगताप यांना साडेतीन बिघे जमीन आहे. सगळी द्राक्षाची बाग... ती उभी करायला वडिलांनी आयुष्याची सगळी पुंजी संपवली. मुलगा लक्ष देईल, दोन पैसे घरात येतील, असे वडिलांना वाटले होते. पण, झाले वेगळेच. अस्मानी संकटामुळे सलग तीन वर्षे बागेला फळ आले नाही. खर्च व कर्ज वाढत चालले म्हणून प्रा. जगताप यांनी द्राक्षबाग तोडण्याचा निर्णय घेतला.

नावाला प्रदेशाध्यक्ष घरात मात्र वाळवंट...

प्रा. जगताप म्हणतात, मी बाहेर नावाला प्रदेशाध्यक्ष पण घरात मात्र वाळवंट... वडिलांची दोन हजार रुपये पेन्शन अन्‌ मला सीएचबीचा खर्च जाऊन सात - आठ हजार रुपये येणाऱ्या पगारावर घर चालवायचे. मुलाचे शिक्षण, आईचा आजार अन्‌ वरून संघटनेसाठी प्रवास करायचा तर हलाकीची परिस्थिती, संकटे, गरिबीविरुद्ध माझ्यापेक्षा माझे कुटुंबच ताकदीने लढले. त्यांनी कधीच माझ्या पायात बेडी अडकवली नाही. राज्याचा अध्यक्ष म्हणून अनेक लोक त्यांच्या जिल्ह्यात बोलवत असतात. पण, मी जाऊ शकत नाही. प्रवासाला अनेकदा पैसेच नसतात. घर खर्चात काटकसर करून वडील मला उरलेले सगळे पैसे देतात. पण, ते देऊन - देऊन किती देणार? महिन्यात फार तर तीन ते चार हजार उरतात. काटकसरीने एखाद्या जिल्ह्याचा प्रवास होऊ शकतो. पण, हे कोणाला सांगता येत नाही. वरून अनेक लोक म्हणतात. प्रदेशाध्यक्षाला काय कमी आहे? लोक हेही म्हणतात संघटना तुला प्रवासाला पैसे देत असेल. लोकांना सत्य माहित नसते, याची खंत प्रा. जगताप यांनी मांडली.

The farmer destroyed the grape yard due to losses
Nashik | ऐन दिवाळीत 3 ST कर्मचाऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

सततच्या अतिवृष्टी, अस्मानी संकटामुळे द्राक्षबागा जगविणे कठीण होत आहे. मी आयुष्यभर संघर्ष करत आलोय ते आई - वडिलांची साथ व साडेतीन बिघे जमिनीच्या भरवशावर. पण, आता वडील थकलेत आणि पिक साथ सोडायला लागलेत. म्हणून तुटून पडल्यासारखं वाटते. मी कित्येकांना भेटून आधार दिला असेल. कित्येकांना न्याय मिळावा म्हणून अधिकारी, नेते यांना भिडलो असेल. पण, शेवटी मी पण माणूस आहे. लवकरच राजू शेट्टी यांना अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती करणार आहे. - प्रा. संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमीन शेतकरी संघटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com