त्र्यंबकेश्वर- स्थानिक आखाडा परिषदेसह अखिल भारतीय आखाडा परिषदेबाबत येथील सगळेच संभ्रमात आहेत. प्रयागराज कुंभमेळ्यानंतर आखाडा परिषदेत पडलेली फूट चिंताजनक आहे. दशनामी आखाडा तसेच जुना बडा उदासिन, नया उदासीन व निर्मल आखाडा व दशनामी आखाड्यातील महानिर्वाण व सहयोगी अटल आखाडा हे देखील स्वतंत्र भूमिका घेऊ लागल्याने आखाडा परिषदेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी (ता.१) साधुमहंतांची बैठक नाशिक येथे होत असून साधुमहंतांची उपस्थिती व मागणी यावरून नेमके चित्र स्पष्ट होईल.