इगतपुरी- निसर्गाचा लहरीपणा, अवकाळी पावसाचा तडाखा, वातावरणातील असमतोलपणा आणि त्यातच सततच्या ढगाळ वातावरणामुळे झाडांचे बिघडलेले आरोग्य व गेल्या महिनाभरापासून वाढलेल्या उष्णतेमुळे यंदा ऐन उन्हाळ्यात येणाऱ्या गावठी रानमेव्याला ‘बुरे दिन’ आले आहेत. .सध्याच्या वाईट परिस्थितीमुळे व वेळोवेळी येणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे गावरान आंबा, जांभूळ व करवंदांसह आवळ्याच्या कोवळ्या फळांना फटका बसल्यामुळे रानमेव्याच्या उत्पादनात घटीची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे..जिल्हाभरात आंब्याबाबत परिस्थिती सारखीच राज्याच्या कृषी नकाशावर फळ आणि रानमेव्याचा जिल्हा म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे. मात्र अलीकडच्या बदलत्या हवामानामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रकारच्या पिकांसह फळा-फुलांना लहरी वातावरणाचा फटका बसत आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे वेळापत्रक पूर्णता कोलमडले तर आहेच, शिवाय आता गावरान रानमेव्याबाबतही तेच घडत असल्यामुळे काही भागात आर्थिक संकट उद्भवणार आहे..करवंद व जांभळावर संक्रांतइगतपुरी तालुक्याला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. त्यातच कसारा घाटाचे विस्तीर्ण जंगल यामुळे या भागात शेंद्र्या, दौडी, साखऱ्या, पिठल्या, भोपळ्या, कलम्या व गावरान आंब्याच्या जातीसह जांभूळ, करवंद व गावठी आवळ्याची झाडे आहेत. दर वर्षी भरभरून उत्पन्न देणाऱ्या भागात मात्र नैसर्गिक असमतोलामुळे भरभरून आलेला मोहोर या वातावरणाच्या कचाट्यात सापडून जळाल्यामुळे उत्पादनात घट होण्याचे शिक्कामोर्तब झाले आहे..आदिवासी मुकणार हक्काच्या कमाईला गावठी रानमेवा आणि आदिवासी बांधवांचे वेगळे असे आर्थिक नाते आहे. जेवढ्या जास्त प्रमाणात रानमेवा उपलब्ध होईल तेवढ्या प्रमाणात आदिवासी व डोंगरदऱ्यांत वास्तव्य करणाऱ्यांना आर्थिक हातभार मिळत असतो, उन्हाळ्यात येणाऱ्या रानमेव्याच्या (गावरान आंबा, करवंद, जांभूळ, शेंद्र्या, गावठी आवळा) विक्रीतून प्रपंच भागवून येणाऱ्या हंगामाच्या तयारीसाठी हेच दोन पैसे आवरून ठेवत नियोजन केले जाते. मात्र यंदा उत्पादनच घटणार असल्यामुळे आर्थिक चणचणीचा सामना करावा लागणार आहे.. यंदाच्या हंगामात येथील जंगलात करवंद, जांभळाच्या झाडांना व गावरान आंब्यांना चांगला मोहोर आणि बहार आला आहे. मात्र ऐन फळ काढणीच्या काळात वेळोवेळी पडणारा अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण व उष्णतेचा तडाखा बसत असल्यामुळे बहार झटकला जात आहे. त्यामुळे यंदा दोन पैसे कमीच मिळतील याची आतापासूनच शंका येत आहे. -अंजनाबाई खडके, फशाबाई तेलम,चिंचलेखैरे (ता. इगतपुरी).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
इगतपुरी- निसर्गाचा लहरीपणा, अवकाळी पावसाचा तडाखा, वातावरणातील असमतोलपणा आणि त्यातच सततच्या ढगाळ वातावरणामुळे झाडांचे बिघडलेले आरोग्य व गेल्या महिनाभरापासून वाढलेल्या उष्णतेमुळे यंदा ऐन उन्हाळ्यात येणाऱ्या गावठी रानमेव्याला ‘बुरे दिन’ आले आहेत. .सध्याच्या वाईट परिस्थितीमुळे व वेळोवेळी येणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे गावरान आंबा, जांभूळ व करवंदांसह आवळ्याच्या कोवळ्या फळांना फटका बसल्यामुळे रानमेव्याच्या उत्पादनात घटीची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे..जिल्हाभरात आंब्याबाबत परिस्थिती सारखीच राज्याच्या कृषी नकाशावर फळ आणि रानमेव्याचा जिल्हा म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे. मात्र अलीकडच्या बदलत्या हवामानामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रकारच्या पिकांसह फळा-फुलांना लहरी वातावरणाचा फटका बसत आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे वेळापत्रक पूर्णता कोलमडले तर आहेच, शिवाय आता गावरान रानमेव्याबाबतही तेच घडत असल्यामुळे काही भागात आर्थिक संकट उद्भवणार आहे..करवंद व जांभळावर संक्रांतइगतपुरी तालुक्याला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. त्यातच कसारा घाटाचे विस्तीर्ण जंगल यामुळे या भागात शेंद्र्या, दौडी, साखऱ्या, पिठल्या, भोपळ्या, कलम्या व गावरान आंब्याच्या जातीसह जांभूळ, करवंद व गावठी आवळ्याची झाडे आहेत. दर वर्षी भरभरून उत्पन्न देणाऱ्या भागात मात्र नैसर्गिक असमतोलामुळे भरभरून आलेला मोहोर या वातावरणाच्या कचाट्यात सापडून जळाल्यामुळे उत्पादनात घट होण्याचे शिक्कामोर्तब झाले आहे..आदिवासी मुकणार हक्काच्या कमाईला गावठी रानमेवा आणि आदिवासी बांधवांचे वेगळे असे आर्थिक नाते आहे. जेवढ्या जास्त प्रमाणात रानमेवा उपलब्ध होईल तेवढ्या प्रमाणात आदिवासी व डोंगरदऱ्यांत वास्तव्य करणाऱ्यांना आर्थिक हातभार मिळत असतो, उन्हाळ्यात येणाऱ्या रानमेव्याच्या (गावरान आंबा, करवंद, जांभूळ, शेंद्र्या, गावठी आवळा) विक्रीतून प्रपंच भागवून येणाऱ्या हंगामाच्या तयारीसाठी हेच दोन पैसे आवरून ठेवत नियोजन केले जाते. मात्र यंदा उत्पादनच घटणार असल्यामुळे आर्थिक चणचणीचा सामना करावा लागणार आहे.. यंदाच्या हंगामात येथील जंगलात करवंद, जांभळाच्या झाडांना व गावरान आंब्यांना चांगला मोहोर आणि बहार आला आहे. मात्र ऐन फळ काढणीच्या काळात वेळोवेळी पडणारा अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण व उष्णतेचा तडाखा बसत असल्यामुळे बहार झटकला जात आहे. त्यामुळे यंदा दोन पैसे कमीच मिळतील याची आतापासूनच शंका येत आहे. -अंजनाबाई खडके, फशाबाई तेलम,चिंचलेखैरे (ता. इगतपुरी).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.