Traffic
sakal
सटाणा: मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वडपे-भिवंडी रस्त्यावर (शंग्रिला रिसॉर्टजवळ) शुक्रवारी (ता. १९) दुपारपासून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. तब्बल चार ते पाच तासांच्या अडथळ्यामुळे सात-आठ किलोमीटर लांबीच्या वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले असून, काही रुग्णवाहिका कोंडीत अडकून रुग्णांचे हाल झाले.