Water Crisis
sakal
नाशिक: जिल्ह्यात यंदा टंचाईवरील उपाययोजनांसाठी सात कोटी ३८ लाख २५ हजार रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. ऐन उन्हाळ्यात जिल्ह्यातील एक हजार ८४ गाव-वाड्यांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. या गाव-वाड्यांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी आराखड्यात १६२ टँकर प्रस्तावित करण्यात आले आहेत.