Chhagan Bhujbal
sakal
विंचूर: शेतकरी बांधवांना सिंचनासाठी आवश्यक असलेल्या विजेची गरज ओळखून शासनाकडून महावितरणच्या माध्यमातून नवीन वीज उपकेंद्र उभारण्यात येत आहेत. या उपकेंद्रांच्या माध्यमातून शेतकरी व ग्राहकांना अखंड व मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केले.