Encroachment
sakal
येवला: शहरातून जाणाऱ्या नगर-मनमाड महामार्गावरील सर्व प्रकारच्या अतिक्रमणांमुळे अपघात होऊन निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. मागील आठवड्यात ७२ तासांत तीन जणांचा बळी गेल्यानंतर, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि ब्रिक्स ह्यूमन राइट्स मिशन या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता. १०) पालिकेपुढे आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पुढील अनर्थ टळला. या आंदोलनाची दखल घेऊन मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी तातडीने बैठक घेऊन अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला सुरुवात केली.