येवला: जिल्हा परिषदेच्या गटांच्या संख्येत तालुक्यात बदल झाला नसून पंचायत समितीचे गणही ‘जैसे थे’ आहेत, पण नावात मात्र बदल झाला आहे. आता सायगाव गण गवंडगाव झाला, नागडे गण उंदीरवाडी, तर चिचोंडी गण निमगाव मढ नावाने ओळखला जाणार आहे. त्यातच आरक्षणाची पद्धत बदलल्याने इच्छुकांची डोकेदुखी वाढली असून, आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले आहे. नव्या पिढीत दुसऱ्या फळीत अनेक तरुण व उमदे नेतृत्व तयार झाल्याने या वेळी गटासह गणातही उमेदवारीसाठी स्पर्धा लागणार असे चित्र आहे.