Agricultural News : येवला तालुक्यात पिकांची राखरांगोळी; 'दिवाळी साजरी करायची कशी? शेतकऱ्यांचा सवाल

Heavy Rain Causes Massive Crop Damage in Yeola : येवला तालुक्यात झालेल्या विक्रमी अतिवृष्टीमुळे मका, कांदा रोपे आणि सोयाबीन पिकांची मोठी हानी झाली आहे. ६४ हजार हेक्टर क्षेत्रावर पाणी साचल्याने शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
Crop Damage in Yeola

Crop Damage in Yeola

sakal 

Updated on

येवला: तालुक्याच्या कुठल्याही कोपऱ्यात नजर टाकली तरी शेतकरी कुटुंबांचे विदारक चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. कुठे मका भुईसपाट, कुठे बिट्या पाण्यात, तर कांद्याची रोपे आणि लागवड कुजली आहे. सोयाबीन, दाणे पाण्यात बुडाले आहेत. शेतकऱ्यांची राखरांगोळी झाली असून, दोन दिवस उलटूनही शेतात पाणीच पाणी साचले आहे. अशा स्थितीत ‘आता दिवाळी साजरी करायची कशी, फराळ खायचा की चिखल खायचा?’ असा सवाल शेतकऱ्यांनी डोळ्यांत अश्रू आणून केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com