Water Crisis
sakal
येवला: ब्रिटिशकालीन दुष्काळी असलेल्या येवल्याच्या आवर्षणप्रवण पूर्व भागाला वर्षागणिक पाणीटंचाईचे संकट गडद होत आहे. या वर्षी धो-धो पाऊस पडूनही खरीप हंगामातील पिके अक्षरशः शेतातच सडली. पावसाळा संपून तीन महिने उलटत नाही तोच विहिरी, कूपनलिका कोरड्या पडू लागल्या आहेत. जास्त पावसामुळे मोठ्या प्रमाणात बागायत घेतलेल्या शेतकऱ्यांना आता पिके वाचविण्याची कसरत करावी लागत असून, शेतातील पिके जगण्यासाठी टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येत आहे.