Mangerpada projec
sakal
येवला: केवळ पालखेड डाव्या कालव्यावर अवलंबून असणाऱ्या दुष्काळी येवलेकरांना या वर्षी प्रथमच दरसवाडी - डोंगरगाव कालव्याचेही पाणी मिळाले आहे. धरणे ओव्हरफ्लो झाल्याने पालखेड दीड महिन्यातून, तर डोंगरगाव कालवा २१ दिवसांपासून प्रवाहित आहेत. त्यामुळे एरवीही कोरडेठाक राहणाऱ्या उत्तर पूर्व भागातील ७५ हून अधिक बंधारे भरले असून, आता पाणी घेता का पाणी, असे म्हणण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.