नाशिक- जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्र्यंबकेश्वर शहराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. नाशिक शहर आणि परिसरातही दिवसभर मध्यम ते जोरदार सरी कोसळल्या. सततच्या पावसामुळे गंगापूर व पालखेड धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे.