धुळे- येथील महापालिका रोज पाणीपुरवठा करण्याच्या नादात वाढत्या ‘टीडीएस’ आणि ‘पीएच’कडे दुर्लक्ष करीत असून, या प्रमाणातील तफावतीमुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे, अशी तक्रार शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने प्रशासनाकडे केली. यात बाभळे जलशुद्धीकरण केंद्र शेवटचा घटका मोजत असून, उर्वरित दोन केंद्रांमध्ये क्षमतेपेक्षा कमी प्रमाणात जलशुध्दीकरण केले जात असल्याची धक्कादायक माहिती या पक्षाने उजेडात आणली आहे.