नागपूर ः शेतकऱ्यांचे वीजबिल थकबाकीमुक्त करण्यासाठी महावितरणने महाकृषी ऊर्जा अभियान आरंभिले आहे. त्या अंतर्गत महावितरणकडून उमरेड विभागातील पाचगाव, वेलतूर, कुही आणि उमरेड येथे शेतकरी मेळावे घेण्यात आले. महावितरणच्या आव्हानाला प्रतिसाद देत १३० शेतकऱ्यांनी एकरकमी १७ लाखांचा भरणा केला. अभियानांतर्गत नागपूर परिमंडळातील ५ हजार १०० शेतकऱ्यांनी ३ कोटी ७३ लाख रुपयांचा भरणा केला आहे.
महावितरणचे नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी एकरकमी भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार केला. पाचगाव येथील मेळाव्यात ३७ शेतकऱ्यांनी ५लाख ४५ हजार रुपयांचा एकरकमी भरणा केला. यावेळी पाचगाव ग्राम पंचायतच्या सरपंच उषा ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य सुनीता ठाकरे, पंचायत समिती सदस्या प्रियांका लोखंडे उपस्थित होत्या. एकरकमी ३५ हजारांचा भरणा करणाऱ्या चंद्रभागा वानखेडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कुही येथील मेळाव्यात कुही पंचायत समितीच्या सभापती अश्विनी शिवणकर, उपसभापती वामन श्रीरामे, तितूरचे सरपंच घोडे पाटील, अकोला ग्राम पंचायतचे सरपंच गजानन धांडे, सिलाई ग्राम पंचायतचे सरपंच लालभाऊ दंडारे उपस्थित होते. तितूरचे सरपंच घोडे पाटील यांनी ९५ हजार रुपयांचा एकरकमी भरणा केला.
वेलतूर येथे झालेल्या मेळाव्यात अंभोरा येथील सरपंच राजू कुकडे यांनी सौर प्रकल्पाकरिता १२ एकर शासकीय जागा देण्याचा ग्रामपंचायतचा ठराव प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांना हस्तांतरित केला. उमरेड येथे झालेल्या मेळाव्यात उमरेड नगर पालिकेच्या नगराध्यक्षा विजयालक्ष्मी भदोरिया, नगरसेवक सतीश चौधरी, उमेश हटवार उपस्थित होते.
संपादन - अथर्व महांकाळ
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.