पाऊस आला धावून, शेत गेले वाहून! मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान

farm.
farm.

मेंढला नरखेड(जि. नागपूर) : दि. 14 च्या मध्यरात्री नरखेड तालुक्‍यातील मेंढला,वडविहरा, चांदणीबर्डी, रामपुरी, या भागात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे इथल्या शेतांना तलावाचे स्वरुप आले होते. मेंढला येथील शेतकरी ज्ञानेश्वर श्रावण चरपे यांचे शेत नाल्याला लागुन आहे. नाल्याचे पाणी शेतात शिरल्यामुळे दोन एकर कपाशी खरडुन गेली व काही भागात पाणी साचले आहे. त्यामुळे तेथील कपाशी पिवळी पडली आहे. अती पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे

मेंढला, वडविहरा, रामपुरी, चांदणीबडी व परीसरातील गावांमध्ये मंगळवारी मध्यरात्री मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नाल्यांना पूर आल्याने नाल्याकाठच्या शेतकऱ्यांना चांगलाचा फटका बसला आहे

कुठे शेतात पाणी साचले तर कुठे कपाशी खरंडुन गेली
मेंढला येथील शेतकरी ज्ञानेश्वर श्रावण चरपे यांची शेती ही वडविहरा शिवारात आहे .
शेतालगत नाला असून त्या नाल्यांची जलयुक्त शिवार अभियानांतर्गत दुरुस्ती, खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. सदर काम पूर्ण झाल्यानंतर आलेल्या पहिल्याच मुसळधार पावसामुळे या नाल्याच्या दुरूस्तीचे पितळ उघडे पडले.

नाल्याच्या पुराचे पाणी शेतात शिरल्याने त्यांच्या नाल्यालगतच्या दोन एकर शेताला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले होते. शिवाय पाण्याच्या प्रवाहामुळे या शेतातील कपाशीचे पिकही खरडुन गेले त्यामुळे त्यांच्यावर चांगलेच आर्थिक संकट ओढवले आहे. या मुसळधार पावसाचा फटका परिसरातील मेंढला, रामपुरी, चांदणीबडी, वडविहरा, या शिवारातील शेतकऱ्यांना बसला आहे.

कारण सर्वदूर बरसलेल्या या मुसळधार पावसामुळे काही शिवारातील नाल्यांना व नदीला पूर आले होते. काहींच्या शेतात पावसाचे पाणी साचले असून काहींची शेती पिकांसह खरडून गेली आहे. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने तातडीने या नुकसानग्रस्त शेताची पाहणी करून संबंधित शासनाकडून योग्य नुकसान भरपाई मिळवुन द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दुबार पेरणी नंतर पुन्हा संकट
या शेतात आपण दुबार पेरणी केली होती अशी माहिती ज्ञानेश्वर श्रावण चरपे यांनी दिली. शेतालगतच्या नाल्यालगत 2018 ते 2019 मध्ये जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत खोलीकरणाचे काम करण्यात आले होते. या कामाचा दर्जा निष्कृट असल्याचा फटका माझ्या शेताला बसला व माझी दोन एकरातील कपाशी खरडुन गेली व काही भागात पाणी साचले आहे. पाणी साचलेल्या ठिकाणची कपाशी पिवळी पडते आहे. तरी शासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी माझी मागणी आहे .
ज्ञानेश्वर श्रावण चरपे
शेतकरी मेंढला

शेतकऱ्यांचे नुकसान
कृषी अधिकारी डॉ. योगीराज जुमडे यांच्या सोबत भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता त्यांनी काही भागात मुसळधार पावसामुळे नाल्या व नदीलगत असलेल्या शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे असे सांगितले. तसेच नुकसान झालेल्या भागाचा पंचनामा करण्याचे निर्देश कृषी मंडळ अधिकारी , कृषी सहायक, पटवारी, यांना दिले आहेत. त्यांच्या नुकसानाचा अहवाल कृषी कार्यालयात आणुन दिल्यावर किती नुकसान झाले आहे ते कळेल
डॉ योगीराज जुमडे
कृषी अधिकारी नरखेड

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com