मानवाधिकाराचे उल्लंघन झाल्यास यांना धरणार जबाबदार!

court-hammer
court-hammer

नागपूर  : नागरिकांकडून  टाळेबंदीची अंमलबजावणी करून घेताना पोलिसांना अनेकदा कठोर भूमिका घ्यावी लागते. यासंबंधीच्या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने महत्त्वाची भूमिका मांडली.
 दरम्यान लॉकडाऊनची अंमलबजावणी करताना पोलिस प्रशासनाकडून नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचे व मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यासाठी, पोलिसांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त केले. या बाबत रामदासपेठ येथील रहिवासी संदीप नायर यांनी दाखल केलेली जनहित याचिका न्यायालयाने निकाली काढली.
याचिकेनुसार, कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी देशभर लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. असे असताना नागरिक विनाकारण बाहेर फिरत आहेत. पोलिस अशा नागरिकांवर कान पकडून उठाबशा काढायला लावणे, ‘मी राष्ट्रद्रोही आहे’ असे लिहिलेले फलक हातात देऊन फोटो काढणे व ते फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणे इत्यादी विविध प्रकारची कारवाई करीत आहेत.  त्यामुळे, मानवाधिकारांचे उल्लंघन होत आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.
मागील सुनावणी दरम्यान, लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस यंत्रणेला संविधानाने पुरेसे अधिकार दिलेले आहेत. अंमलबजावणी करीत असताना मानवाधिकारांचे पोलिसांकडून उल्लंघन होणार नाही याची खात्रीदेखील न्यायालयाला आहे. मात्र, उल्लंघन होण्याची एक जरी घटना घडल्यास पोलिस आयुक्तांनी संबंधित परिसरातील पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याला यासाठी जबाबदार धरावे, असे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार, पोलिस आयुक्तांनी शपथपत्र दाखल करीत यापुढे मानवाधिकारांचे उल्लंघन होणार नाही याची खात्री दिली. याचिकाकर्त्याला याद्वारे दिलासा मिळाल्याने न्यायालयाने याचिका निकाली काढली. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. चैतन्य काटपुरिया यांनी, सरकारतर्फे अ‍ॅड. केतकी जोशी यांनी कामकाज पाहिले. प्रकरणावर न्यायमूर्ती रवी देशपांडे आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

सविस्तर वाचा - वेळ रात्री अकराची...युवतीसोबत रस्त्यावर बोलत होता पोलिस कर्मचारी...मग काय झाले वाचा...
सुशिक्षित नागरिक नियम कसे मोडतात?
स्वतःला आदरणीय, सन्माननीय समजणारे सुशिक्षित नागरिक लॉकडाऊनमध्ये नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत या नियम मोडणाऱ्या नागरिकांची दखल घ्यायला हवी की, याचिककर्त्यांच्या म्हणण्यानुसार नागरिकांना सन्मानाची वागणूक न देणाऱ्या पोलिसांची दखल घ्यायला हवी, हा गंभीर प्रश्न असून याबाबत विचार करणे गरजेचे आहे. तसेच, सुशिक्षित नागरिक नियम कसे मोडतात, असा सवाल देखील न्यायालयाने उपस्थित केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com