सुखी संसाराचा करूण अंत; मैत्रिणीच्या लग्नास जाण्यास पतीनं केला विरोध अन् नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल 

newly married women end her life as husband not giving permission for go to wedding in Nagpur
newly married women end her life as husband not giving permission for go to wedding in Nagpur

नागपूर ः आयुष्याच्या वेलीवर लग्न भावबंधनात जोडणारा आनंददायी सोहळा असतो . वसंत ऋतूत फुलणाऱ्या फुलांसारखा संसारातही सुखाच्या फुलांची उधळण व्हावी आणि हृदयात जपलेल्या नात्यांचे , मैत्रीचे आशीर्वाद द्यावे , असे प्रत्येकांना वाटते . मात्र काळ खडतर असला तर जिवाभावाच्या पाल्याडही जाता येत नाही . सध्याचा काळ हा महामारीचा आहे . या काळात प्रत्येकालाच स्वतःसह कुटुंबाची काळजी वाटते . कोरोनाची लाट नव्याने आली असताना जागरूकव्यक्ती कुटुंबातील व्यक्तीला कुठेही भटकू देणार नाही . पण जिवाभावाच्या मैत्रिणीचे लग्न असताना सोहळ्याला जाता येत नसेल तर पुढच्या सखीने काय करावे ? आपले मन कितीही संवेदनशील असले तरी ठेच लागू नये , यासाठी थांबले पाहिजे.

पतीने प्राणप्रिय मैत्रिणीच्या लग्नसोहळ्याला जाऊ दिले नाही , याक्षुल्लक कारणावरून संतापलेल्या नवविवाहितेने टोकाचे पाऊल उचलत गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटनावाडी पोलीस ठाण्यांतर्गत सोनबानगरात उघडकीस आली . शुभांगी आशिष मेश्राम (२५) असे मृतक नवविवाहितेचे नाव आहे.

उपराजधानी पुन्हा कोरोनाच्या विळख्यात सापडली असताना मैत्रिणीच्या लग्नाला जाऊ दिले नाही म्हणून शुभांगीने आत्महत्या करून आयुष्याचा अखेर केला . नवदाम्पत्याच्या अभिनंदन आणि शुभेच्छांसाठी मोबाइल होता किंवा कोरोना लाट कमी झाल्यानंतरही तिला मैत्रिणीची भेट घेता आली असती . मात्र कोणताही विचार न करता तिने संतापाच्या भरात आयुष्याची राख करून टाकली . तिच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे . 

कोरोना वाढतोय जाऊ नकोस 

सुखी संसाराची स्वप्ने बघणाऱ्या मैत्रिणीवर आभाळ कोसळले नसेल काय ? काहीच महिन्यांपूर्वी तिचेलग्न झाले होते . ती खडगाव मार्गावरील सोनबानगर येथे वास्तव्याला होती.तिचा पती आशिष मेश्राम हे सुरक्षारक्षक म्हणून काम करतो . रविवार , २१ फेब्रुवारीला नागपूर येथे शुभांगीच्या मैत्रिणीचे लग्न होते . या लग्नाला जाण्यासाठी तिने पतीकडे हट्ट धरला होता . जिवाभावाची मैत्रीण असल्यामुळे तीसुद्धा वारंवार शुभांगीला फोन करीत होती , पण पतीने बाहेर कोरोनाचा प्रसार खूप झपाट्याने होत असल्याचे कारण सांगून तिला जाण्यास विरोध केला . 

एका क्षणात संपवलं जीवन 

गेल्या दोन दिवसांपासून दोघांमध्ये या विषयावरून भांडण सुरू होते . शनिवारी सकाळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला . पतीने पत्नीला लग्नाला जाण्यास स्पष्ट नकार दिला आणि तो कामावर निघून गेला . मात्र पत्नीच्या विस्कटलेल्या मनात जरा वेगळेच विचारचक्र सुरू होते . तिने मैत्रिणीच्या लग्नाला जाऊ दिले नाही म्हणून रागाच्या भरात शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास राहत्या घरी सीलिंग करू फॅनच्या हुकला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून जीवनयात्रा संपविली.

पतीला दिसला मृतदेह 

एका लग्नसोहळ्याच्या हुलकावणीने नवविवाहितेचा बळी घेतला पण मैत्रीला नाव नसताना शुभेच्छाही कोरड्या बनून गेल्या . पती दुपारच्या सुमारास घरी आला तेव्हा शुभांगी गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली . वाडी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले . मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला . या प्रकरणी वाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला . मात्र आत्महत्या करून शुभांगी पतीसह मैत्रिणीला भविष्याचे दुःख देऊन गेली.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com