अहो ! स्वतःसाठी तरी सोशल डिस्टन्सिंगचा विचार करा...!

 वानाडोंगरी  : रेशन दुकानांसमोर सोशल डिस्टन्सिंगचा अभाव
वानाडोंगरी : रेशन दुकानांसमोर सोशल डिस्टन्सिंगचा अभाव

वानाडोंगरी (जि.नागपूर) :  जीवनावश्‍यक वस्तू जनतेला त्वरित मिळायला पाहिजे, असे शासनाचे आदेश असल्यामुळे "सील' केलेले दुकान शनिवारी(ता. 11) त्वरित सुरू करण्यात आले. त्यामुळे आज दुकानात एवढी गर्दी झाली की, ग्राहक अगदी सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी करून एकदम एकमेकांजवळ चिपकून उभे होते. त्यामुळे "सील' उघडलेल्या दुकानात सोशल डिस्टन्सिंगचे बारा वाजल्याचे बघायला मिळाले. प्रत्येक जण सरकारचा आदेश धुळकावित लावण्यात पुढे असून दुकानदारालाही याचे भान नाही, याचे आश्‍चर्य वाटते !

दुकान की मकान ?
या दुकानाबाबत ज्या तक्रारी आहेत, त्याच तक्रारी रामटेक तालुक्‍यातील टेकाडी येथे होत्या. त्यामुळे टेकाडी येथील दुकानावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. हिंगणा तालुक्‍यातील दुकान मात्र ताबडतोब सुरू करण्यात आले. राजीवनगरचे हे दुकान, दुकान आहे की मकान आहे, हेच कळत नाही. दुकानाचे दर्शनी भागावर ठराविक नमुन्यात फलक लावलेला नाही. फलकच नाही, तर माहिती कुठून असणार? दुकानात साठाफलक, भावफलक, सूचना फलक नाही. दुकानाच्या नावाचा फलक नाही, तर वेळ दर्शविणारा फलक कुठे राहणार? तालुक्‍यात एक-दोन दुकान सोडले, तर कुठेही पावती दिल्या जात नाही. दक्षता समित्या कागदोपत्री आहे. ही निटनेटकी माहिती अमरनगर येथील भगवान बालपांडे यांच्या दुकानात बघायला मिळाली. अंत्योदय व बी. पी. एलधारकांची यादी लावलेली नाही. ग्राहकांच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी किंवा दखल घेण्यासाठी पुरवठा निरीक्षक सक्षम नाही.

धान्य वितरण व्यवस्थेतील त्रुटी त्वरित दूर करा
खापरखेडा :  राज्य शासनाकडून निर्गमित केलेल्या परिपत्रकाप्रमाणे जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अनियमितता होऊ नये व गरजू लाभार्थींना याचा पूर्ण लाभ मिळावा याकरिता अंत्योदय कार्डधारकाना दोन रुपये प्रतिकिलो दराने 15 किलो गहू आणि तीन रुपये प्रतिकिलो दराने 20 किलो तांदूळ मिळणार आहे. फक्त अंत्योदय कार्डधारकाला 20 रुपये किलो दराने साखर देण्यात येणार आहे. परंतु, आतापर्यंत जिल्ह्यातील काही लाभार्थींना धान्य मिळालेले नाही. तसेच योजनेतर्गत प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य अतिरिक्त मिळणार आहे. परंतु, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनपर्यंत मिळाले नाही. ज्या गावाला धान्य उपलब्ध आहे, तिथे एका कुटुंबाला 35 किलो धान्य मिळाला पाहिजे. तिथे मात्र कमी प्रमाणात धान्य देण्यात येत आहे. त्याची पावतीसुद्धा मिळत नसल्याची तक्रार आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकान सकाळी 8 ते एक व दुपारी तीन ते 8 या काळात चालू ठेवण्याचे आदेश दिले असले, तरी बरेच दुकान दिलेल्या वेळेत चालू राहात नसल्याचे नागरिकांची ओरड आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी नागरिकांना होत असलेल्या असुविधेकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे जिल्हा ग्रामीण संघटक श्रीराम सातपुते यानी केली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com