आणखी 20 दिवस घरीच बसा, नियम होणार अधिक कठोर

shutter lock
shutter lock

नागपूर : तीन दिवसानंतर लॉकडाऊन संपल्यानंतर घराबाहेर पडण्याचे बेत आखलेल्यांची निराशा झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनमध्ये वाढ केल्याने आणखी 20 दिवस नागरिकांना घरातच बसावे लागणार आहे. त्यामुळे सुमारे 50 दिवस घरातच राहण्याचा अनोखा विक्रमही होणार आहे.
लॉक डाऊनमुळे घरात बंदिस्त झालेले नागरिक कंटाळले आहेत. रोज काय करावे हेच अनेकांना सुचेनासे झाले आहे. टीव्ही बघून किती वेळ टाईमपास करायचा असाही प्रश्‍न अनेकांना पडला आहे. मॉर्निंग वॉकलाही निघता येत नसल्याने अनेकजण अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे केव्हा एकदाचा लॉकडाऊन संपतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. लॉकडाऊनचे अवघे तीन दिवस शिल्लक असल्याने अनेकांना हायसे वाटत होते. मात्र उलट घडले. सर्वप्रथम लॉकडाऊन जाहीर केलेल्या महाराष्ट्राने पुन्हा एकदा कालावधी वाढवला आहे. तो तब्बल 20 दिवसांचा आहे. यानंतरही परिस्थिती सुधारली नाही तर आणखी वाढ केली जाईल असे सुतोवाचही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.        यात मोलमजुरी करणारे, रोजच रोजगाराच्या शोधात असलेले भरडले जाणार आहे.
कोरोना संशयितांची वाढती संख्या बघून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 16 मार्चला सर्वप्रथम महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर केले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यानंतर लॉकडाऊनमधून सुटका होईल अशीच सर्वांची अपेक्षा होती. मात्र मुंबई, पुण्यासह इतर शहरांमध्येही कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे.  

  देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. रुग्णांच्या संपर्कात आलेले काहीजण अद्यापही मोकळे फिरत आहेत. त्यामुळे काही वस्त्यांना जाणीवपूर्वक सिल करण्यात आले आहे. दिवसेंदिवस कोरोना संशयितांच्या संख्येतही वाढ होत चालली आहे. त्यामुळे यापुढे लॉकडाऊन आणखीच कडक राहणार असल्याचे संकेतही सरकारतर्फे देण्यात आले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com