अखेर दोन महिन्यांनंतर दोन हजारावर उद्योगांच्या यंत्रांची घरघर सुरू

industree.
industree.
Updated on

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या दोन महिन्यापासून टाळेबंदी घोषित करण्यात आली आहे. तीन मे च्या आदेशानंतर काही अटी व शर्तींवर टाळेबंदी शिथिल करण्यात आली होती. सरकारच्या निर्णयानंतर नागपूर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र काहीसे पूर्वपदावर येऊ लागले आहे. जिल्ह्यात 2 हजार 143 लघू आणि मोठे उद्योग सुरू झाले आहेत. 40 हजार कामगार कामावर रुजू झाले आहेत.
दोन महिन्यानंतर एमआयडीसीतील आणि बाहेरील उद्योगधंदे सुरू झालेत. नागपूर जिल्हा आणि शहरातील अनेक उद्योग सुरू झालेत. जिल्ह्यातील सहा एमआयडीसी आणि एमआयडीसी बाहेरील हे 2हजार 143 उद्योग सुरू आहेत. या ठिकाणी तब्बल 39 हजार 200 कामगार काम करत आहेत. नागपूर जिल्ह्यातील 3 हजार 506 उद्योगांनी उद्योग सुरू करण्यासाठी अर्ज केले होते. त्यातील सर्वांनाच परवानगी देण्यात आलेली आहे. त्यातील 2 हजार 143 उद्योग सुरू झालेले आहेत.
लॉकडाऊनमध्ये गेल्या दोन महिन्यापासून जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी आणि उद्योगधंदे ठप्प होते. तिसरा लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर शासनाने कोरोनामुळे ठप्प झालेल्या उद्योगांची चाके पुन्हा फिरावी यासाठी अत्यावश्‍यक सेवेतील उद्योगांना परवानगी दिली. मात्र, उद्योजकांसमोरच्या अडचणी संपलेल्या नाहीत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे माल वाहतुकीवर मर्यादा आल्याने बाहेरून येणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा विस्कळीत झालेला आहे. दुसरीकडे परप्रांतियांसह स्थानिक कामगार, कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा संसर्ग वाढण्याच्या भीतीने शहरे सोडून मोठ्या संख्येने गाव जवळ केले आहे. त्यामुळेच उद्योग सुरू करण्याची परवानगी मिळाल्यानंतरही प्रत्यक्षात उद्योग सुरू करण्यात अडचणी येत आहेत. उद्योगधंदे सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
नागपूर जिल्ह्यात उमरेड, भिवापूर, हिंगणा, बुटीबोरी, कळमेश्‍वर, मौदा या एमआयडीसीमध्ये बहुतेक कारखाने सुरू झाले आहेत. बुटीबोरी, हिंगणा मधील कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक वाहनांना परवानगी देण्यात आलेली आहे. तसेच काही कंपनीच्या डेडिकेटेड बसमधून कर्मचाऱ्यांना प्रवासाची परवानगी दिली आहे. औद्योगिक क्षेत्रातील केईसी, सीएटसह काही मोठ्या कंपन्या सुरू झालेल्या आहेत. मात्र, अद्यापही इंडोरामा आणि जॉन्सन या कंपन्यांनी आपले काम सुरू केलेले नाही. लघू व मध्यम उद्योग 30ते 40 टक्केच सुरु झालेले आहेत. त्यात कर्मचाऱ्यांची संख्याही 40 ते 45 टक्के आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात कामगारांची वर्दळ वाढली आहे. कच्चा माल आणणे आणि तयार वस्तूंची वाहतूक करण्यासाठी वाहनेही उपलब्ध नाहीत. ही अडचण आता मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे.

सविस्तर वाचा - खबरदार, रस्त्यांवर जनावरे सोडाल तर...
बॅंकांची कर्ज देण्यासाठी टाळाटाळ
उद्योजकांनी उद्योग सुरू केलेत. कोरोनामुळे उद्योग बंद असल्याने त्यांच्याजवळील खेळते भांडवल संपल्याने त्यांनी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या योजनेनुसार बॅंकेकडे कर्जासाठी पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. बॅंक प्रशासनाकडून आमचे मागील वर्षाचेच ऑडीट झालेले नसल्याने नवीन कर्ज देणे शक्‍य नसल्याचे सांगून उद्योजकांना कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे उद्योग सुरू केलेत. पण खेळते भांडवलच नसल्याने उत्पादन कसे सुरू करणार असा प्रश्‍न आता त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. कारण कामगारांचे पगार करणे आणि कच्चा माल खरेदी करण्यासाठी भांडवल उद्योगाला बुस्ट देण्यासाठी महत्त्वाचे आहे.
शशिकांत कोठाळकर, सचिव, बुटीबोरी मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिशएन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com