प्रवेश एकीकडे; शिकवणी दुसरीकडे

Access aside; Teaching, on the other hand
Access aside; Teaching, on the other hand

रिसोड (जि.वाशीम) : पालक आपला पाल्य चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याच्या दृष्टीने महानगरांमध्ये महागड्या शिकवण्या लावतात. मात्र, या विद्यार्थ्यांचा प्रवेश ग्रामीण भागातील अडगळीत पडलेल्या महाविद्यालयात असतो. आता बारावीच्या प्रकल्प परीक्षा सुरू झाल्याने, अनेक नवख्या विद्यार्थ्यांचे जत्थेच्या जत्थे महाविद्यालयांत अवतरले आहेत. त्यामुळे तालुक्यातील महाविद्यालयीन शिक्षणावर खर्च होणारे लाखो रुपये व्यर्थ तर ठरत नाहीत ना? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.


बारावीचे वर्ष हे विद्यार्थी देशेतील अतिशय महत्त्वाचे वर्ष होय. बारावीच्या शिक्षणावरच विद्यार्थ्यांचे पुढील भवितव्य अवलंबून असते. त्यामुळे बहुतांश सधन पालकवर्ग आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी लौकीक प्राप्त असलेल्या शहरांमध्ये पाठवितात. सदरील विद्यार्थी तेथे वर्षभर शिकविणीतून धडे घेतात. मात्र, या विद्यार्थ्यांचे प्रवेश हे ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये असतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना त्यांची बारावीची परीक्षा देण्याकरिता सदरील महाविद्यालयांतर्गत येणार्‍या परीक्षा केंद्रावरच यावे लागते. त्यामुळे सध्या इयत्ता बारावीच्या प्रकल्प परीक्षा सुरू झाल्या आहेत. ही बाब पाहता तालुक्यातील नियमीत शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांना प्रकल्प परीक्षेकरिता नवख्या विद्यार्थ्यांचे दर्शन होत आहे. तर या परीक्षेतही पैकीच्या पैकी गुण देण्यांवर बहुतांश शाळांचा कल असतो. त्यामुळे नियमीत शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांमधून आश्‍चर्य व्यक्त केल्या जात आहे.

मग शिक्षणावर खर्च कशासाठी?
दहावीनंतर इयत्ता अकरावी, बारावीत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शासन शिक्षकांच्या वेतनावर लाखो रुपये खर्च करते. त्यामुळे हा खर्च सुद्धा व्यर्थ ठरत आहे?, शिक्षण संस्था केवळ पांढरा हत्ता ठरत असल्याच्या प्रतिक्रिया सुज्ञ नागरिकांमधून उपस्थित होत आहेत.

विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर प्रश्‍नचिन्ह
नियमीत विद्यार्थी म्हणून परीक्षेचे आवेदनपत्र भरणारा विद्यार्थी शाळेत ठरावीक कालावधीत उपस्थित असणे गरजेचे आहे. मात्र, खरचं ग्रामीण भागातील महाविद्यालयांमधील प्रकार पाहून, हे विद्यार्थी दररोज शाळेत येत असतील काय? असा प्रश्‍न सुद्धा उपस्थित केला जात आहे.

पाल्य हुशार तर ग्रामीण भागाला पसंती कशासाठी?
विज्ञान शाखेत शिक्षण घेणार्‍या पालकांना आपला पाल्या एनईईटी, जेईई, सीईटी आदी परीक्षांमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याची अपेक्षा असते. त्यामुळे ह्या परीक्षांवर लक्ष केंद्रीत करून बारावीची परीक्षा त्यांच्यासाठी कमी महत्त्वाची ठरते. ही बाब पाहता, पाल्य हुशार तर, ग्रामीण भागातील महाविद्यालयांत त्याचा प्रवेश कशासाठी? हा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

कॉपीमुक्त परीक्षा फक्त देखावा?
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याकरीता कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा देण्याबाबत जनजागृती केली जाते. मात्र, हा केवळ देखावा असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया सुजान नागरिकांमधून उपस्थित होत आहेत. केवळ परीक्षांत कॉप्या करून पास होण्यावर बहुतांश विद्यार्थ्यांचा भर असतो. त्यामुळे कॉपीमुक्त अभियान केवळ बोलाचाच भात अन बोलाचीच कढी ठरतो. ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रांवर होणारे गैरप्रकारांवरून हे दिसून येते. त्यामुळे शिक्षण विभागाने सुद्धा विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेणे गरजेचे आहे.

संबंधितांवर कारवाई करू
तालुक्यात अशाप्रकारचा विषय निदर्शनास आल्यास, निश्‍चितच त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करू
-टी. एन. नरळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी, वाशीम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com