वनीकरण विभागाचे लाखो रुपये पाण्यात, संवर्धनाअभावी लावलेली सर्व रोपे मृत

all plants are died due negligence of forestry department in sihora of bhandara
all plants are died due negligence of forestry department in sihora of bhandara
Updated on

सिहोरा ( भंडारा )  :  चुल्हाड-सुकळी नकुल मार्गाने दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली.  मात्र, सामाजिक वनीकरण विभागाच्या दुर्लक्षामुळे अनेक रोपे मृत झाली आहेत. या रोपांचे जतन आणि संवर्धन केले नाही. शिवाय सुरक्षेसाठी थातुरमातूर कठडे लावले आहेत. या प्रकरणात झालेल्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

पर्यावरण संतुलन राखण्यासाठी शासनस्तरावर अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. शासन निधीही उपलब्ध करून देत आहे. परंतु, खर्च केला तरी, त्याचे सकारात्मक परिणाम दिसत नाही. चुल्हाड-सुकळी नकुल या गावांना जोडणाऱ्या ५ किमी अंतराच्या मार्गावर सामाजिक वनीकरण विभागाने वृक्ष लागवड केली आहे. प्रथम ऑक्‍टोबर 2018 मध्ये दोन किमी अंतरापर्यंत दुतर्फा रोपे लागवड केली होती. या दोन वर्षात रोपांची उंची दोन फुटानेसुद्धा वाढली नाही. अनेक रोपे अर्धा फूट उंचीवरच आहेत. रोपांच्या सुरक्षेसाठी थातुमातूर कठडे तयार केले आहेत. अनेक कठड्यांची नासधूस झाली आहे. परंतु, सामाजिक वनीकरण विभागाने गंभीरतेने दखल घेतली नाही. 

या रस्त्याच्या दुतर्फा एक हजार रोपे लावल्याचे फलकावर नमूद केले आहे. मात्र, प्रत्यक्षात तितकी रोपे जिवंत नाहीत. या रोपांचे जतन आणि संवर्धनावर लाखोंचा खर्च करण्यात आला आहेत. परंतु, त्याचे सकारात्मक परिणाम दिसत नाही. त्यामुळे दुतर्फा वृक्ष लागवड उपक्रम फसला आहे. 

याच विभागाने रनेरा शिवारात रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड करण्यात आली होती. त्या वृक्षांचे जतन आणि संवर्धन चांगले झाल्याने सकारात्मक परिणाम दिसत आहेत. मात्र, तसे परिणाम चुल्हाड-सुकळी मार्गावर दिसत नाही. ग्रामीण भागातील रस्त्याच्या बाबतीत सामाजिक वनीकरण विभाग उदासिन दिसून येत आहे.  त्यामुळे वृक्ष लागवड प्रकाराची चौकशी करण्याची मागणी सुरू झाली आहे.

अनेक ठिकाणी वृक्षारोपण झालेच नाही -
वन विभागाच्या हद्दीत अनेक हेक्‍टर जागेत वृक्षारोपण करण्याची मागणी जुनीच आहे. देवसर्रा, गोंडीटोला, सुकळी नकुल, चुल्हाड, बपेरा गावांच्या शिवारात शेकडो हेक्‍टरमध्ये अतिक्रमण आहे. या जागेवर सामाजिक वनीकरण विभाग वृक्षलागवड करीत नाही. यामुळे शतकोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट गाठता येत नाही. 

नवीन रोपांचे नियोजन नाही -
सामाजिक वनीकरण विभागाने वृक्ष लागवड केली पण रोपे मृत झाले. त्या ठिकाणी नवीन रोपे लागवड करण्यासाठी पुढाकार घेतला जात नाही. एकदा रोपे लावल्यानंतर हात झटकण्यात येत आहे. रोपे जिवंत आहेत किंवा नाही? याची साधी चौकशी होत नाही. रोपांची देखभाल, जतन, संवर्धन या कामावर लाखो रुपये खर्च होतात. परंतु, नियोजन व नियंत्रणाच्या अभावामुळे उद्देश साध्य होत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com