

Amravati
esakal
अमरावती: जुलैतील पहिल्या सप्ताहातील दमदार पावसाने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांतील जलसाठ्यात वाढ झाली आहे. मोठ्या धरणांसह मध्यम व लघू प्रकल्पातील जलसाठ्यात सरासरी पाच दलघमीची वाढ झाली असून मध्यम धरणांच्या श्रेणीतील पूर्णा मध्यम प्रकल्पातील जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी बुधवारी (ता. ८) विसर्ग सोडण्यात आला. जिल्ह्यात सद्यस्थितीत ४४.२५ टक्के जलसाठा झाला असून एक सप्ताहापूर्वी तो ३९.८९ टक्के होता.