Amravati Lockdown: अमरावती जिल्ह्यात लॉकडाउनचे नवे नियम जाहीर; वाचा काय राहील सुरु आणि काय बंद 

amravati
amravati

अमरावती: गेल्या काही दिवसांपासून अमरावतीमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्यानं वाढताना दिसून येत आहेत. यामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. मात्र तरीही नागरिकांची गर्दी रस्त्यांवर दिसून येत आहे. म्हणूनच आता प्रशासनानं लॉकडाउन संदर्भातील नवे नियम जाहीर  केले आहेत.  यात काही शिथिल करण्यात आल्या आहेत तर काही गोष्टींवरचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. हे सर्व नियम दिनांक १८ मार्च सकाळी ६ वाजतापासून पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यातील सर्व भागांत लागू असणार आहेत. 

काय आहेत कोरोना लॉकडाउनचे नवे नियम

सर्व शासकीय कार्यालयं २५ टक्के उपस्थितीत सुरु राहणारं आहेत. कार्यालयांमध्ये मास्क  सोशल डिस्टंसिंग ठेवणं अनिवार्य असणार आहे. 

सर्व प्रकारची दुकानं सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत सुरु राहतील. 

सर्व प्रकारचे लॉज आणि धर्मशाळा ३३ टक्के क्षमतेसह सुरु असतील. नियम न पाळल्यास लॉज मालकांना तब्बल ८ हजारांचा दंड आकारल्या जाणार आहे. 

ग्राहकांनी जवळपासच्या बाजारातच खरेदी  अनिवार्य असणार आहे. गरज नसेल तर दूरच्या बाजारपेठेत जाऊ नये असं आवाहन करण्यात आलंय. 

सर्व प्रकारचे हॉटेल्स आणि उपहारगृहं सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. हॉटेल्स आणि उपहारगृहांची वेळ सकाळी ९ ते संध्याकाळी ६ असणार आहे. मात्र जेवणासाठी ३३ टक्क्यांपेक्षा कमी ग्राहकांची उपस्थित अनिवार्य असणार आहे. 

सर्व आस्थापनांनी 'NO MASK NO ENTRY'  लावणं अनिवार्य असणार आहे. तसंच कोरोनाचे नियम पाळणं अनिवार्य असणार आहे. 

लग्न समारंभासाठी फक्त २५ व्यक्तींना परवानगी असणार आहे. तसंच वाजंत्रीवाल्यांना लग्न स्थळावरच बँड वाचवण्याची परवानगी देण्यात आली आहे. नियम न पाळल्यास आयोजकांना २० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तसंच केवळ ५ वाजंत्रीवाल्यांना परवानगी देण्यात येणार आहे. 

खासगी वाहतुकींमध्ये दुचाकीवर मास्क आणि हेल्मेटसह दोघांना परवानगी देण्यात आली आहे. तर चारचाकीमध्ये तिघांना परवानगी देण्यात आली आहे. तसंच ऑटोमध्ये दोघांना बसण्याची परवानगी असणार आहे.

ठोक भाजीमंडई पहाटे २ ते सकाळी ७ पर्यंत सुरु असणार आहे. मात्र या भाजीमंडईत किरकोळ भाजी विक्रेत्यांनाच प्रवेश असणार आहे. 

अमरावती जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व शाळा या पूर्णपणे बंद असणार आहेत. तसंच उत्तरप्रत्रिका तपासणी आणि इतर कामांसाठी शाळा, महाविद्यालयं सुरु असणार आहेत. 

जिल्हातील शैक्षणिक केंद्र आणि शिकवणी वर्ग यांना सकाळी ९ ते दुपारी ५ वाजेपर्यंत परवानगी असणार आहे. मात्र यासाठी प्रत्येक बॅचमध्ये ७ विद्यार्थ्यांनाच बसण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसंच प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये ६ फुटांचं अंतर असणं महत्वाचं असणार आहे. 

जिल्ह्यातील सिनेमागृहं, जलतरण तलाव, नाट्यगृहं, उद्यानं, प्रेक्षकगृहं इत्यादी ठिकाणं पूर्णपणे बंद असणार आहेत. 

जिल्हातील व्यायाम शाळा, जिम आणि योग प्रशिक्षण केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र एका बॅचमध्ये ७ पेक्षा अधिक जण असू नयेत अशी आत घालण्यात आली आहे. तसंच प्रतयके वेळी कोरोनाच्या नियमांचं पालन आणि निर्जंतुकीकरण आवश्यक असणसर आहे. 

जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व प्रकारचे सामाजिक,राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा सर्व कार्यक्रमांवर बंदी असणार आहे.  

जिल्ह्यात घेण्यात येणाऱ्या शासकीय आणि निमशासकीय सर्व परीक्षांना परवानगी देण्यात येणार आहे. तसंच ठिकाणांनाही परवानगी देण्यात येणार आहे. 

जिल्ह्याच्या महापालिका क्षेत्र आणि शहरी भागांमधील सर्व प्रकारचे आठवडीबाजार बंद असणार आहेत. 

 संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com