अमरावती : तेरा गावांतील पथदिव्यांची बत्ती गुल

ग्रामपंचायतींचा भोंगळ कारभार नागरिकांच्या जिवावर
Amravati thirteen villages street lights off
Amravati thirteen villages street lights offsakal

जामली : चिखलदरा तालुक्यातील तेरा ग्रामपंचायतींनी वीजबिल न भरल्यामुळे गावातील पथदिवे बंद राहत असून ग्रामपंचायतींचा हलगर्जीपणा नागरिकांच्या जिवावर उठला आहे. ग्रामपंचायतला येणारे वीजबिल आधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरले जात होते. पण, आता १ एप्रिल २०२१ पासून जिल्हा परिषदेने आपले हात आवरले असून येणारे विद्युत बिल ग्रामपंचायतीनेच भरावे, असे आदेश काढले आहेत. त्यामुळे बहुतांश ग्रामपंचायतींकडे वीज वितरण कंपनीचे लाखोंचे बिल थकीत आहे. त्यामुळे आधी वीजबिल भरा, मगच लाइन वापरा, अशी ताकीद महावितरणकडून देण्यात आली असून गौलखेडाबाजार फीडरअंतर्गत येणाऱ्या तेरा गावांत वीजबिल न भरल्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.

सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. सर्व जिवजंतू जमिनीबाहेर बिळातून निघत आहेत. जामली, चिचखेडा, टेम्ब्रूसोडा, चांदपूर, धर्मडोह, बहादरपूर, सती, वाकी आदी गावांतील पथदिवे बंद असल्यामुळे समोरचे काहीच दिसत नाही. अशातच जंगलातील हिंस्र पशू हे गावाकडे धाव घेतच आहेत. त्यामुळे बऱ्याच पाळीव प्राण्यांची शिकार झाल्याच्या घटना घडल्या आहेत व घडत आहेत. त्याकरिता ग्रामपंचायतींनी आपल्या येणाऱ्या मिळकतीतून वीजबिल भरावे व जनतेला सहकार्य करावे, अशी मागणी गावांतील नागरिक करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com