उन्हाच्या झळा वाढल्या, पाण्यासाठी प्राण्यांची सुरू भटकंती

deer
deer

दिग्रस (जि.यवतमाळ) : खळखळणारे नदीनाले... पाण्याने तुडुंब भरलेले डोह... झुळझुळ वाहणारे नद्यांचे प्रवाह... किलबिल करणारे पक्षी... कोकिळेचे मंजुळ गाणे... मोरांची म्यॉंव म्यॉंव... वृक्षवल्लींमध्ये वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार...असे दृष्य आज रानावनात पाहायला मिळत नाही. कारण, निसर्गातील 'जीवन' म्हणून ओळखला जाणारा अत्यंत महत्त्वाचा 'पाणी' नावाचा घटक आटल्याने जंगलात पाण्यासाठी जणूकाही 'लॉकडाऊन' सुरू असल्याचे चित्र अनुभवास येत आहे. पाण्यासाठी वन्यजीव नागरी वस्त्यांकडे कूच करीत आहेत.

चैत्र महिनाही अर्धा झाला. लवकरच वैशाखही लागणार आहे. वैशाखापूर्वीच सूर्याने आग ओकणे सुरू केले आहे. निसर्गातील नदी, नाले, जलस्रोत आजच आटले आहेत. उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली आहे. घशाला कोरड पडत आहे. देशभर संचारबंदी सुरू आहे. सर्व जग घरांत दडून बसले आहे. जंगलात मात्र कुठलेच 'लॉकडाऊन' नाही. तरीदेखील पाणवठ्याअभावी वन्यजीवांमध्ये 'लॉकडाऊन' सुरू असल्याचे चित्र आहे. पाणी मिळेल या आशेने वन्यप्राणी नागरी वस्त्यांच्या दिशेने कूच करीत आहेत. त्यात कांही हिंस्र प्राण्यांचाही समावेश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मानव व वन्यप्राण्यातील संघर्ष उद्‌भवू शकतो.

हे वन्यप्राणी गावाकडे येऊ नये, यासाठी वनांत पाणवठे तयार करून वन्यप्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. मात्र, सध्या शासन कोरोनाची उपाययोजना करण्यात व्यस्त आहे. त्यामुळे वनविभागाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. पाणवठ्यांअभावी जंगलात 'लॉकडाऊन' झाले असल्याने तहानेने व्याकूळ वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. उन्हामुळे नदिनाल्यांसह जमिनीतील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटत आहेत. त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी व पक्षी शेतशिवाराकडे येत आहेत. शेतात असलेले रब्बी व उन्हाळी पिकांचे नुकसानसुद्धा करीत आहेत. प्राणी व पक्षी गावालगतच्या तलावावर पाणी पिण्यासाठी येतात. त्यामुळे अशा ठिकाणी प्राण्यांची शिकार होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

वनविभागाने कोरोनामुळे लॉकडाऊनचे नियम पाळून योग्य ते नियोजन करून वन्यप्राण्यांकरीता पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी वन्यप्रेमींकडून होत आहे. दिग्रस तालुक्‍याच्या चहूबाजूंच्या जंगलात रोही, हरिण, काळवीट, मोर, लांडोर, ससे, रानडुक्कर, माकड व इतर जंगली प्राणी आहेत. तर मानोरा रोडवरील रोहना बीटच्या झुडपी जंगलात रोही, काळवीट व हरणाचे कळपच्या कळप दृष्टीस पडतात. वनविभागाने या वन्यप्राण्यांचे रक्षण करणे गरजेचे आहे. 

वनविभागाने त्वरित पाणवठे तयार करावेत 
दरवर्षी वनविभागाकडून उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच जंगलात वन्यप्राण्यांकरिता कृत्रिम पाणवठे तयार केले जातात. यावर्षी कोरोनामुळे दुर्लक्ष होत आहे. पाण्यासाठी वन्यप्राण्यांची भटकंती सुरू झाली आहे. तरी वनविभागाने त्वरित "ऍक्‍शन मोड'मध्ये येऊन कृत्रिम पाणवठे तयार करावेत. वन्यप्राण्यांसह पशुपक्षांसाठी पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी येथील सर्पमित्र तथा वन्यजीव प्रेमी रवी गोरे यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com