

अमरावती : माणसाने जीवन जगताना केलेल्या चांगल्या कामाचे जेव्हा कौतुक होते तेव्हा त्या कौतुकाच्या प्रेमात पडू नका, नाहीतर तुमची प्रगती थांबेल. मानवी जीवन मिळालेला प्रत्येक व्यक्ती हे जग येथेच सोडून जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करा, असा यशाचा मूलमंत्र आणि जीवनाचा वास्तविक अर्थ समारंभाचे उद्घाटक सिने अभिनेता भारत गणेशपुरे यांनी दिला.