वातावरण काही चांगले होईना; बळीराजाची होतेय दैना

harveshtar.
harveshtar.
Updated on

तेल्हारा (जि. अकोला) : यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी बऱ्यापैकी वाढली. तसेच तालुक्यात असलेला एकमेव वान प्रकल्प पूर्ण भरल्याने सिंचनासाठी पुरेसे पाणी सोडण्यात आल्याने तालुक्यात गव्हाची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली होती आता गहू काढणीला आला आहे. पण, मजुरांची टंचाई आणि ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी हार्वेस्टरला पसंती देत आहेत.

हार्वेस्टरचे देखील भाव वाढले
गेल्या दोन-तीन वर्षापासून पावसाने अल्प प्रमाणात हजेरी लावल्याने परिसरातील नदी-नाले सिंचन प्रकल्प तळे कोरडेठाक पडले होते. तसेच भूगर्भातील पाण्याची पातळी देखील खूप खोल गेली होती. त्यामुळे बघायची क्षेत्र घटले होते. पण, यावर्षी समाधानकारक पाऊस झाला भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली. तालुक्यामध्ये असलेल्या एकमेव सिंचन प्रकल्प वान प्रकल्प तुडूंब भरला. त्यामुळे पिण्याची तहान भागवून मागे सिंचनासाठी देखील पाणी देण्याची तयारी सिंचन विभागाकडून दर्शवण्यात आली. त्यामुळे तेल्हारा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी प्रकल्पातील पाण्यावर गहू, हरभरा ही रब्बी पिके पेरली. ज्वारीची पिके बऱ्यापैकी आहे.

आता गहू, हरभरा सोंगणीला आहे. त्यातच ढगाळ वातावरण असल्याने प्रत्येक शेतकऱ्याला आपला माल घरात यायला पाहिजे असे वाटू लागले. त्यातच मजुरांची टंचाई असल्याने आणि हरभरा नोंदणीसाठी सर्वांनाच मजूर मिळत नाही. परिणामी, हरभरा हार्वेस्टरने काढणे शक्य होत नसल्याने हरभरा सोंगण्याचे काम मजुरांमार्फत केले जाते. गव्हासाठी मात्र, हार्वेस्टरला शेतकरी पसंती देत आहेत. कारण, एकाच दिवसात शेतातील गहू सोंगणी मळणी करून घरात येतात. हार्वेस्टरने एका तासात सुमारे दोन एकरातील गहू तयार केला जातो. यामुळे वेळेची व पैशाची बचत होते. हार्वेस्टरच्या मालकांनी देखील दर वाढवले आहेत. मजुरांनी सोंगल्यापेक्षा हार्वेस्टर गहू काढणे परवडत शेतकऱ्यांचे मत आहे

हरभऱ्याची मळणी हार्वेस्टरने करत नाहीत
यावर्षी सिंचनासाठी वाण प्रकल्पातून पाणी मिळाल्याने गहू हरभऱ्याचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हरभरा हार्वेस्टरने काढल्यास मोठे नुकसान होते. त्यामुळे शेतकरी हरभऱ्याची मळणी हार्वेस्टर करत नाहीत. पण गव्हासाठी सोंगनी व मळणीला मजूर मिळत नसल्याने हार्वेस्टरने गहू काढल्या जातो.
-श्‍यामकुमार ढाकरे, शेतकरी, दानापूर


हार्वेस्टरद्वारा सोंगणीच्या दरात वाढ
गतवर्षी हार्वेस्टरने एक हजार रुपये एकरा प्रमाणे गहू काढल्या जात होता. परंतु, यावर्षी मात्र हार्वेस्टरच्या मालकांनी हे दर वाढवून बाराशे ते पंधराशे रुपये केलेले आहे. यावर्षी पावसाळा चांगला झाल्याने भूगर्भातील पाणी पातळी वाढली. त्यामुळे ज्यांची स्वतःची सिंचनाची व्यवस्था आहे त्यांनी व काहींनी प्रकल्पाच्या पाण्यावर गहू, हरभरा आदींची पेरणी केल्याने रब्बी पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com