
Wardha Farmer
sakal
वर्धा : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेला पावसाचा जोर शेतकऱ्यांसाठी नुकसानदायी ठरला आहे. सोयाबीन शेंगांचा काेंबे फुटल्याने आणि कपाशीचे बोंडे सडत असल्याने शेतकरी हताश झाले असून उत्पन्नाची आशा पुरती मावळली आहे. शासनाकडून शेतकर्यांना अद्याप कुठलीही आर्थिक मदतीची घाेषणा झाली नसल्यामुळे शेतकरी चिंताक्रांत झाला आहे.