Video : अन्नधान्य संपले, निवाराही नाही, उपाशीपोटी ते ढकलताहेत एकेक दिवस

mirchi.
mirchi.

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : कोरोनाने मिरची तोडणीचे काम थांबले. मालकानेही साथ सोडली. गाववाल्यानी बाहेर काढले. किराणा सामान देण्यास कुणी तयार नाही. आता तर आम्हाला शेतात संसार थाटण्याशिवाय पर्यायच उरला नाही. जेवणाचे तर सोडा पिण्याच्या पाण्याचे मोठेच वांधे आहेत. अशा स्थितीत मायबाप सरकार आम्हाला बाहेर काढणार का अशी आर्त हाक तेलंगणात अडकलेल्या मजुरांनी दिली आहे. सोबतच आपल्या आप्तेष्टांना त्यांनी व्हाटसऍपवर पत्र लिहून आपल्या वेदनांचा पाढाच मांडला.


कोरोना व्हायरसने अख्या जगभरात थैमान घातले. भारतात सर्वाधिक बाधीत रूग्ण महाराष्ट्रात आहेत. अशात कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधानानी संपुर्ण देश लॉकडाऊन केला. याचा अनेकांना मोठा फटका बसला. गोंडपिपरी तालुक्‍यातील बोरगाव व करंजी येथील वीस मजुर तेलंगणातील खम्मम जिल्हयातील बारलागुडा येथे गेले होते. दिवसभर मिरची तोडायची अनं मालकाने घराच्या बाजूला दिलेल्या ठिकाणी मुक्काम ठोकायचा. एक किलो मिरची तोडली की दहा रुपये मिळतात. अशात दिवसभर पंचेवीस तर कधी तीस किलो मिरची तोडायची अन अडीचशे तीनशे रुपये कमवायचे.

अशात कोरोनाच्या थैमानाने मालकाने मिरची तोडणीचे काम बंद केले. सोबत आता तुमचे तुम्ही बघा असे सांगत हात वर केले. कोरोनाची लागण होईल. या भितीने या 20 मजुरांना गावाबाहेर जाण्यास भाग पाडण्यात आले. अशा गंभीर स्थितीत ज्या ठिकाणी हे मजूर मिरची तोडत होते. त्याच ठिकाणालगत एका शेतात त्यांनी उघड्यावरच आपला डेरा टाकला. संपूर्ण संचारबंदी त्यातल्या त्यात राज्य वेगळे असल्याने मनात असूनही ही मंडळी कुठे जाउ शकत नाहीत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शेतातच मजूरांचे उघड्यावरचे जिणे सुरू आहे. काही मजुराकंडे असलेल्या साहित्यांने सुरवातीचे दिवस अनेकांची भुक भागविली. पण आता संपूर्ण साहित्य संपलेले आहे. तेलंगणातले दुकानदार सामान देण्यास तयार नाही. गावातही एन्ट्री मिळणे कठीणच. अशात आता पिण्याच्या पाण्याचे वांदे असल्याने या वीस मजुरांची अतिशय बिकट परिस्थिती आहे. याकडे कुणी लक्ष देईल का अन आमची सुटका होईल का असा प्रश्न ते विचारत आहेत.

भावनिक पत्र
कोरोनामुळे आपल्या वाट्याला येत असलेल्या या वेदना आपल्या आप्तांना कळावाव्यात यासाठी त्यांनी व्हाटसऍपवरून एक पत्र लिहीले अनं आपली आपबीतीच मांडली. अनं येथून सोडविण्यासाठी काही तरी करा हो, अशी आर्त हाक मारली.

गोंडपिपरीतील 25 तर चार्मोशीतील 400 मजूर
तेलंगणाच्या विविध प्रांतात महाराष्ट्रातील किमान पाचशेच्यावर मजूर लटकेलेले आहेत. या सर्वांची अतिशय दैन्यावस्था होत आहे. गोंडपिपरीतील पंचशील वॉर्डातील 25 मजूर तर चार्मोशी तालुक्‍यातील आंबोली, येनापू ,वायगाव व परिसरातील सुमारे चारशे मजूर, पोभुर्णा अन मुल तालुक्‍यातील प्रत्येकी 25 मजूर तेलंगणातील विविध भागात लटकले आहेत.


सरकारने लक्ष दयावे
शेतात उघडयावर दिवस काढावे लागत आहेत. कुणी किराणा देत नाही, गावातही येऊ देत नाहीत. अशावेळी साहित्य संपल्याने मजूरांना भुकेचा सामना करावा लागत आहे. अशीच स्थिती राहिल्यास आमचा मृत्यू होऊ शकतो अशी भिती मजूरांनी व्यक्त केली आहे. मायबाप सरकार या अतिशय गंभीर स्थितीकडे लक्ष देईल का असा प्रश्‍न ते विचारत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com