अफवांवर विश्वास ठेवू नका, अमरावती विभागात अन्नधान्याची टंचाई नाही

Don't believe the rumors, there is no food shortage in the Amravati region
Don't believe the rumors, there is no food shortage in the Amravati region

अमरावती : अमरावती विभागात सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून वितरित करण्यात येणाऱ्या तसेच खुल्या बाजारात अन्नधान्याची कोणतीही टंचाई नाही. राज्यातील कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत गरजूंना अन्नधान्य मिळण्यासाठी प्रशासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.

6 एप्रिलपर्यंत 40 हजार 916 मेट्रिक धान्य स्वस्त धान्य दुकानांपर्यंत वितरित करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य गट योजनेतील पात्र लाभार्थ्यांना गहू तसेच तांदूळ पुरविण्यात येत आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा पुरवठा साखळीवर विपरीत परिणाम झालेला नाही.

अन्न योजनेतून 40 हजार मेट्रिक टन धान्याचे वितरण

विभागात अंत्योदय अन्न योजनेतून आतापर्यंत 9 हजार 664 मेट्रिक टन तर प्राधान्य गट योजनेतून 31 हजार 252 मेट्रिक टन अन्नधान्याचा पुरवठा करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य गट योजनेतून 9 हजार 606 मेट्रिक टन, अकोला जिल्ह्यात 6 हजार 637, वाशीम जिल्ह्यात 5 हजार 288, यवतमाळ जिल्ह्यात 9 हजार 645, बुलडाणा जिल्ह्यात 9 हजार 740 मेट्रिक टन गहू आणि तांदूळ वितरित करण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com