शेतकऱ्यांना दिलासा! प्रशासनाकडून अखेर दुष्काळावर शिक्कामोर्तब; अंतिम पैसेवारी ४६

Drought finally sealed by administration Farmers news
Drought finally sealed by administration Farmers news

यवतमाळ : अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. असे असतानाही नजरअंदाज व सुधारित पैसेवारीत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नव्हता. त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात होती. अंतिम ४६ पैसेवारी प्रशासनाने प्रसिद्ध केली असून, दुष्काळावर शिक्कामोर्तब केले आहे.

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना करीत असतानाच महसूल विभागाने पैसेवारी काढण्याची दुहेरी कसरत केली. गेल्या ३० सप्टेंबरला जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी जाहीर झाली. जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यांत पावसाने शेतपिकांचे नुकसान झाले, असे असले तरी जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ६५ आली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. सुधारित काही प्रमाणात नुकसान दिसून आले होते. मात्र, पैसेवारी ५०च्या वर होती. अंतिम पैसेवारीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्यावर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. गेल्यावर्षी नजरअंदाज पैसेवारी ६०च्यावर होती. मात्र, अंतिम पैसेवारीत सुधारणा झाली. यंदाही जून, जुलै व ऑगस्ट या महिन्यांत पावसाचा फटका पिकांना बसला. असे असले तरी नजरअंदाज पैसेवारी ६५ निघाल्याने पीक परिस्थिती उत्तम असल्याचे प्रशासनाच्या लेखी दिसत होते.

सुधारित पैसेवारीत शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला. शेतकऱ्यांना मदतीसाठी अंतिम पैसेवारी महत्वाची आहे. सप्टेंबरमध्ये पावसाने पिकांना फटका बसला. गेल्या वर्षी पीक काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने आगमन झाल्याने शेतातील पीक अडचणीत सापडले होते. सप्टेंबरमधील पावसाने लवकर पेरणी केलेल्या पिकांना मोठा फटका बसला. सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली. कपाशीला फटका बसला. परिणामी शेतकऱ्यांची एकरी उत्पादनात घट झाली.

अशातच जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ४६ आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सुधारित पैसेवारीवरच बहुतांशवेळी अंतिम पैसेवारी असते. त्यात फारसा बदल होत नाही. यावेळी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान मोठे होते. त्यामुळेच सुधारित व अंतिम पैसेवारीत मोठा बदल झाला. जिल्ह्यात दोन हजार १५९ गावे आहेत. त्यात लागवडीसाठी योग्य असलेल्या गावांची संख्या दोन हजार ४६ एवढी आहे. या सर्व गावांची पैसेवारी जाहीर झाली आहे. जिल्ह्याची अंतिम सरासरी ४६ पैसेवारी आली आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय पैसेवारी

नजरअंदाज 65
सुधारित 54
अंतिम 46
झरी जामणी 48
मारेगाव 46
वणी 46
राळेगाव 47
घाटंजी 46
केळापूर 46
महागाव 47
उमरखेड 47
पुसद 47
नेर 46
दिग्रस 47
दारव्हा 47
आर्णी 47
बाभूळगाव 47
कळंब 47
यवतमाळ 46


संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com