
Vidarbha Tigers
sakal
नागपूर : विदर्भातील वाघांची वाढती संख्या चिंतेचे कारण ठरली आहे. हा ताण कमी करण्यासाठी राज्य शासनाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. केंद्र सरकारने अखेर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या स्थानांतरणास हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे आता विदर्भातील वाघांची डरकाळी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत घुमणार आहे.