चिमूर (जि. चंद्रपूर) : चिमूर-शंकरपूर-कांपा मार्गावरील खैरी जवळ एमएच 19 ऐई 7301 क्रमांकाचा टाटासुमो चालक गुरुवारी सकाळी 10 वाजता अवैध प्रवासी घेऊन जात होता. अचानक चालकाचे नियंत्रण वाहनावरून सुटल्याने झालेल्या अपघातात 11 प्रवासी जखमी झाले. यातील चार प्रवासी गंभीर असल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकरपूर येथील टाटासुमो चालक प्रवासी घेऊन कानपाला निघाला होते. खैरी जवळ वाहन चालक राजीक शेख यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाला. यात वाहन चालक राजीक शेख 22, कविता गोपीचंद मेश्राम 46, गोपीचंद नथू मेश्राम 50, सुमण शालीक डहाके 64, शालीक डहाके 70, प्रभाकर दाघो बारेकर 60, सर्व राहणार शंकरपूर, तर आंबोली येथील कांशीराम गोविंदा ठाकरे 40 व कांता कांशीराम ठाकरे 34, चांदी येथील आडकू तिकडू मारबते 65, जवळी येथील लक्ष्मण ननावरे 65, कवडशी येथील दिनकर पांडुरंग देशमाने हे जखमी झाले. जखमींना शंकरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर जखमींना चिमूर, चंद्रपूर व नागपूरला पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.
असे का घडले? - कोणी सांगेल का? माझी काय चूक होती...
पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे. अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांसह विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अवैध वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांना केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.