मुलीने केले पळून लग्न अन्‌ कुटुंबाने घेतली विहिरीत उडी

Well
Well

गडचिरोली : आई-वडील व मुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शहरात सोमवारी (ता. 10) उघडकीस आली. रवींद्र नागोराव वरगंटीवार (वय 50), वैशाली नागोराव वरगंटीवार (वय 43) आणि साईराम रवींद्र वरगंटीवार (वय 19, सर्व रा. विवेकानंदनगर) अशी आत्महत्या केलेल्या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत. 

प्रियकरासोबत पळून केला विवाह

गडचिरोली शहरातून सेमानाकडे जाणाऱ्या बायपास मार्गावरील आनंदनगर परिसरात असलेल्या एका शेतातील विहिरीत या तिघांचेही मृतदेह सोमवारी आढळून आले. रवींद्र वरगंटीवार यांची मुलगी शनिवारी (ता. 8) प्रियकरासोबत पळून गेली होती. तिने दुसऱ्या दिवशी रविवारी (ता. 9) वेगळ्या समाजाच्या असलेल्या प्रियकराशी चामोर्शी तालुक्‍यातील मार्कंडादेव येथे विवाह केला. या घटनेमुळे मुलीचे वडील रवींद्र वरगंटीवार यांच्यासह त्यांची पत्नी व मुलाच्या मनावर मोठा परिणाम झाला. ते सर्व नैराश्‍यग्रस्त झाले. त्यामुळे तिघांनीही विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची परिसरात चर्चा आहे. घटनेचा तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com