Buldhana News: पाच एकर शेती असूनही उत्पन्न नाही; शेतातील झाडाला गळफास लावत शेतकरी दाम्पत्याने संपवले जीवन, बुलडाणा हादरला
Agrarian Crisis: चिखली तालुक्यातील भरोसा गावात शेतकरी दाम्पत्याने नापिकी, हुमणी अळी व कर्जबाजारीपणामुळे जीवन संपवले केली. लिंबाच्या झाडाला गळफास लावून जीवन संपवले.
बुलडाणा : चिखली तालुक्यातील भरोसा गावात एका शेतकरी दाम्पत्याने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावत आत्महत्या केली. सततची नापिकी आणि हुमणी अळीचा प्रचंड प्रादुर्भाव या साऱ्याचा मानसिक आणि आर्थिक ताण सहन न झाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.