अतिवृष्टी आणि कीडरोगाने सडले पीक अखेर बळीराजाने विष प्राशन करून संपवले जीवन 

Farmer end his life as his crops are damaged due to rain
Farmer end his life as his crops are damaged due to rain

लाखांदूर (जि. भंडारा)  : यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी संकटांची मालिका घेऊन आल्याची  चिन्हे दिसतं आहेत. आधी अतिवृष्टी, परतीचा पाऊस आणि आता पिकांना लागलेली कीड यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासन आणि प्रशासनाकडून मदत जाहीर झाली मात्र अजूनही ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. मात्र यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली असलेला बळीराजा टोकाचे पाऊल उचलत आहे. अशीच एक दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे.   

शेतातील शेतपीक पूर व किडरोगाने ग्रस्त झाल्याने घरात कोणीही नसल्याचे पाहुन मानसिक तणावात येउन एका 40 वर्षीय  शेतकऱ्याने  विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली. सदर घटना रविवारी सकाळी 10 वाजताचे सुमारास लाखांदूर  तालुक्यातील पाचगाव येथे घडली. 

मनोज खुशाल दोनाडकर (40) रा.पाचगाव असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. पोलिस सुत्रानुसार घटनेतील मृतकाकडे मालकी साडेतीन ते चार एकर शेतजमीन आहे. या जमिनीत यंदाच्या खरिपात धान पिकाची लागवड देखील केली आहे.

मागील दोन महिन्यापूर्वी आलेल्या पुरासह परतीच्या पावसाने व किडरोगाने लागवडीखालील पिकशेती नष्ट झाल्याचे पाहुन गत काही महिन्यांपासून मानसिक तणावात दिसून येत असल्याचे गावक-यांनी सांगितले. 

दरम्यान घटनेच्या दिवशी घरात कोणीही नसल्याचे पाहुन मृतकाने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. सदर घटनेची माहिती कुटुंबियांना होताच संबन्धितांनी मृतकाला उपचारार्थ भंडारा येथे हलवित असतांना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. या घटनेची नोंद पालांदूर पोलीसांनी केली असुन पुढील तपास सुरु आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com