बळीराजाने जाळले शेतातील सोयाबीनचे पीक; सरकारकडून मदत मिळत नसल्याने उचलले पाऊल 

farmer fired his soyabean crops as state government is not helping him
farmer fired his soyabean crops as state government is not helping him

यवतमाळ: यंदा संपूर्ण राज्यात पावसानं अक्षरशः थैमान घातलं. अतिवृष्टी, धरणांतून सोडण्यात आलेलं पाणी आणि परतीच्या पावसानं बळीराजाच्या पिकांचं नुकसान केलं. घाम गाळून, कष्ट करून वाढवलेल्या सोयाबीनच्या पीकाचं एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. अपेक्षा होती ती फक्त सरकारच्या मदतीची. मात्र तालुका सरकारी निकषात बसत नाही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं . मग त्या संतापलेल्या बळीराजानं टोकाचं पाऊल उचललं. 

यावर्षी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी असमानी आणि सुलतानी संकटांनी ग्रस्त आहे . सुरवातीला शेतकऱ्यांना दुबार पेरणीला  सामोरे जावे लागले . कशीबशी पैश्याची तयारी करून शेतकऱ्यांनी दुबार पेरणीही केली . जिल्ह्यात दमदार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतात पिके दिमाखात उभी होती .शेतकऱ्यांच्या पदरी दोन पैसे पडतील अशी आशाही निर्माण झाले होती . पण परतीच्या पावसाने पिकांचे मातेरे केले . 

शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या आशाही नष्ट झाल्यात. अश्याच शेतकऱ्यांपैकी एक आहेत महागावचे मनीष जाधव. पावसाने उसंत घेतल्याने सोयाबीन सोंगणीस सुरवात केली .सोयाबीनच्या झालेल्या नुकसानीची कल्पना अधिकाऱ्यांना दिली असता सरकारी निकषात आपला तालुका बसत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले .

संतप्त झालेल्या मनीष यांनी सरकारचा निषेध व्यक्त करीत आपल्या शेतातील सोयाबीन पेटवून दिले. आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे . जिल्ह्यात शेतकऱयांचे परतीच्या पावसाने कंबरडे मोडले आहे . सरकारी निकष बदलून शेतकऱयांना सरसकट मदत देणे गरजेचे आहे . अन्यथा जिल्ह्यातील शेतकरी पुरता कोलमडून जाईल .       

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com