वन्यप्राण्यांच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त

कांदा, ऊस, भुईमुंग पिकांचे प्रचंड नुकसान; वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी
कांदा पिकाचे केलेले नुकसान
कांदा पिकाचे केलेले नुकसानSakal

साखरखेर्डा/बुलडाणा - नैसर्गिक संकटाला तोंड ते उत्पन्न घेण्यासाठी जिवाचे रान करणार्‍या शेतकर्‍यांना आता वन्यप्राण्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाळा लागल्याने जंगलात खाण्यासाठी हिरवा चारा नसल्यामुळे वन्य प्राण्यांनी शेती पिकांकडे कल केला आहे. यात प्रामुख्याने कांदा बियाणे, भुईशेंग, मक्का, ऊस पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. याबाबत वन्य जिवांचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे शेतकर्‍यांच्या वतीने करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा, रताळी, गोरेगाव, देऊळगावराजा तालुक्यातील देऊळगाव मही, अंढेरा, बुलडाणा तालुक्यातील धाड, गुम्मी, पातळी, चिखली तालुक्यातील उंद्री, डोंगरशेवली, अमडापूर, मेहकर तालुक्यातील जानेफळ, देऊळगाव साकरशा, लोणार तालुक्यातील गुंधा, पळसखेड, वडगाव तेजन या परिसरातील शेतकर्‍यांना वन्य प्राण्यांचा फटका बसत आहे. यातच, सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा आणि मोहाडी परिसरात जंगली रोहींंनी धुडगूस घालून कांदा बीजोत्पादन प्लॉटची मोठी नासाडी केली असून बिजोत्पादक शेतकर्‍यांचे हजारो रूपयांचे केले आहे. साखरखेर्डा परिसरात रोहींचे अनेक कळप आहे. एका एका कळपात ३० ते ५० रोही असतात. हे रोही पिकांवर ताव मारण्यापेक्षा पिकांत धुडगूस घालून मोठे नुकसान करतात. साखरखेर्डा व मोहाडी परिसरात मोहन नाईक सह अनेक शेतकर्‍यांनी कांदा बीजोत्पादन चे प्लॉट घेतले आहेत.हे प्लॉट उत्तम बहरले आहेत. या प्लॉटचे प्रत्येकी सुमारे २ते ३ लाखांचे उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे. काल परवा या परिसरात रोहींंनी प्रचंड धुडगूस घालीत टोळ कांदा बियाणांची मोठी नासाडी करून हजारो रूपयांचे नुकसान केले आहे. या रोही प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकर्‍यांनी वन विभागाकडे केली आहे.

साखरखेर्डा , मोहाडी , सवडद , शिंदी , राताळी , पिंपळगाव सोनारा , गुंज , सावंगी भगत , तांदूळवाडी , गोरेगाव , उमनगाव , काटेपांग्री , बाळसमुद्र या भागात मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांनी टोळ कांदा बियाणांची लागवड केली असून यावर्षी च्या निसर्ग संकटांचा सामना करीत अतिशय उत्तम रित्या बहरले आहेत. आणि १५ ते २० दिवसात काढणीली येणार आहेत .अशा स्थितीत शेतकर्‍यांचा हाता तोंडाशी आलेला घास रोही प्राण्यांच्या अकल्पित धुडगूसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त होत आहेत . हे प्राणी ३० ते ५० च्या कळपाने उभ्या पिकातून एकामागे एक धावत सुटतात. त्यामुळे उभा कांदा आडवा पडल्याने आतील बियाणे गळून पडले आहे . या रोही प्राण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी माधव नाईक , प्रकाश रिंढे , नंदकिशोर रिंढे , मदन देशमुख आदी शेतकर्‍यांनी केली आहे.

वनविभागाकडे केवळ आश्‍वासन

पीक नुकसानीबाबत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे वन विभागाच्या वतीने सांगण्यात येऊन त्यानंतर पंचनामा करण्यात येईल असे उत्तर शेतकर्‍यांना दिले जाते. याबाबत वन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना संपर्क केला असता, तो होऊ शकला नाही.

उन्हाळ्या पिकांना जगविणे मोठ्या जिकरीचे काम आहे. परंतु, रात्र्नदिवस मेहनत करून पिकांचे संगोपन केल्या जाते. वन्य प्राण्यांकडून पिके खाण्याबाबत बहुतांश शेतकर्‍यांना हरकत नसावी. परंतु, त्यांच्या धूडगुसमुळे पिकांचे अतोनात नुकसान होते. परिणामी हाता-तोंडाशी आलेला घासही हिरावला जातो.

- रामेश्‍वर गुंजाळ, शेतकरी, उंद्री.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com