

Shock in Maharashtra as Father Takes Extreme Step Following Domestic Dispute
sakal
जळगाव (जामोद), (जि. बुलडाणा) : वादामुळे पत्नीला माहेरी पाठवून दिल्यानंतर एका युवकाने पोटच्या चार मुलांना गाव शिवारातील विहिरीत ढकलून जलसमाधी देत स्वतःही उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी साडेदहा वाजता जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा बु. या गावात घडली. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.