
यवतमाळ : भंडारा येथील जिल्हा रुग्णालयातील जळीतकांड तसेच यवतमाळ येथील लहान मुलांना सॅनिटायझर पाजल्याच्या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन महाविकासआघाडीतील नेत्यांनी दिले होते. प्रत्यक्षात अजनूपर्यंत एकावरही गुन्हे दाखल झालेले नाही. दोन्ही प्रकरणात सरकारने तत्काळ एफआयआर नोंदविले नाही तर राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिला.
सोमवारी (ता. आठ) स्थानिक भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी आमदार मदन येरावार, जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, राजू पडगीलवार आदी उपस्थित होते. भंडारा येथील चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र, अजूनही कारवाई झालेली नाही. केवळ निलंबन करून शासन मोकळे झाले आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या.
यवतमाळ येथे चिमुकल्यांना सॅनिटायझर पाजण्यात आले. या प्रकरणातही केवळ निलंबन करण्यात आले. त्या बालकांचे नशीब बलवत्तर म्हणून प्राण वाचले. एवढी मोठी घटना होऊनही प्रशासन कारवाई करीत नसेल तर शोकांतिका आहे. या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांना काहीही माहिती नव्हती. त्यामुळे शासन केवळ समिती नेमून दिशाभूल करीत असल्याचा आरोप वाघ यांनी केला.
भंडारा तसेच यवतमाळ प्रकरणात महाविकासआघाडीच्या नेत्यांनी तत्काळ दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल न केल्यास भाजप आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही चित्रा वाघ यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.