अंजनगाव सुर्जी ः लग्न करण हे आपल्याकडे पवित्र बंधन मानले जाते. एक लग्न करून आपल्या जोडीदारासोबत आयुष्य घालविण्याचा निर्णय अनेक जोडपी घेतात. पण काही जणांचे साथीदार आपल्या जोडीदाराला सोडून जातात, त्यामुळे काही लोक परत लग्न करण्याचा निर्णय घेतात. अशीच एक घटना अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोली रहिमापूर येथे घडली. येथील कुटुंब प्रमुख विठ्ठल खंडारे यांनी वयाच्या ८४ वर्षी एका ६५ वर्षीय आजीबाई सोबत लग्न केले.
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोली रहिमापूर येथील या व्यक्तीने वयाच्या ८४ वर्षात लग्न केले. हा विवाह करण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील मुलगा, सून, नातवंडांनी संमती दिली होती. या लग्नाची चर्चा तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात आहे.
विठ्ठलरावाच्या पत्नीची तीन ते चार वर्षांपूर्वी निधन झाले. त्यामुळे एकाकी जिवनाची सल त्यांना बोचत होती. परत विवाह करण्याचा मानस त्यांनी मुलांजवळ बोलून दाखविला. परंतू सुरवातीला कुटुंबातील मंडळीने विरोध केला. मात्र नंतर मुलगा, सूनेने संमती दिली आणी अकोट येथील ६५ वर्षीय महिलेशी चिंचोली रहिमापूर येथे विधीवत विवाह पार पडला. या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्यासाठी त्यांच्या मुलामुलीसह नातवंडांनी आनंद घेत ठेका धरला. या विवाह सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी उपस्थिती लावली होती. अनेक मान्यवर आपल्या परिवारासह या सोहळ्याला उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.