अमरावती: प्रेम म्हणजे एक निरागस भावना, विश्वास, आनंद. प्रेमात असलेले अनेकजण एकमेकांसाठी जीव देण्याची सुद्धा तयारी ठेवतात. प्रेमात विश्वास सगळ्यात महत्त्वाचा असतो. पण कुणालाही बळजबरीने प्रेम करण्यास भाग पाडणे हा गंभीर गुन्हा आहे. प्रेमात बळजबरी केलीच तर कधी काय होईल याच काही नेम नाही. अशीच एकतर्फी प्रेमातून एक प्रकार अमरावतीत घडला आहे.
अमरावतीत ग्रामीण भागातील एका विवाहित महिलेचे एका व्यक्तीशी प्रेमसंबंध होते. वर्षभरापासून त्यांचे प्रेमसंबंध सुरु होते. मात्र एक दिवस या प्रेमाला महिलेने ब्रेक लावला. पण त्यामुळे संतापलेल्या तिच्या प्रियकराने असे काही कृत्य केले की या महिलेला थेट पोलिस स्टेशन गाठावे लागले.
रितेश रमेश चांदणे (वय 40) सोबत तिचे प्रेमसंबंध होते. एक महिन्यापासून तिने रितेशसोबत कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवले नाहीत. मात्र या दरम्यान रितेशने या महिलेशी सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तिला सतत फोन करून तो त्रास देऊ लागला.
एक दिवस महिला घरी एकटी असताना रितेशने पुन्हा तिच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तिला फोन करून त्रास देऊ लागला. महिलेने त्याला फोन करू नको असे स्पष्ट शब्दात सुनावले. पण रितेशच्या वर्तनात सुधारणा झाली नाही.
त्याने पुन्हा फोनवरून ती प्रतिसाद देत नसल्याचे बघून तिच्या व्हॉट्सऍपवर मॅसेज पाठविला. भेटण्याचा आग्रह धरला. सततच्या त्रासाला कंटाळून पीडित विवाहितेने मोर्शी ठाण्यात तक्रार नोंदविली. प्रकरणी पोलिसांनी रितेश चांदणेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणात रितेशला अद्याप अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
संपादन - अथर्व महांकाळ
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.